म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील प्रवासी आरक्षण यंत्रणा (पीआरएसी) आपत्कालीन स्थितीतही उत्तम चालावी यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्सतर्फे (क्रिस) पीआरएस यंत्रणेत बदल केले जाणार आहेत. त्यानिमित्त घेतल्या जाणाऱ्या चाचणीसाठी गुरुवार, २ ऑगस्ट रोजी मुंबईतील कम्प्युटराइज्ड तिकीट यंत्रणा (पीआरएस) टप्प्याटप्प्याने बंद केली जाणार आहे. त्यामुळे पश्चिम, मध्य रेल्वेवरील तिकीट आरक्षण केंद्रे काही वेळासाठी बंद राहणार आहेत.
रेल्वे यंत्रणेतील तिकीट आरक्षणाचे मुख्य केंद्र मुंबईसह दिल्ली, चैन्नई, कोलकोता येथे असून एक डेटा केंद्र सिकंदराबाद येथेही आहे. आपत्कालीन स्थितीत तिकीट यंत्रणा कोलमडू नये, समस्या निर्माण होऊ नये यासाठी क्रिस संस्थेतर्फे या यंत्रणेत काही बदल केले जाणार आहे. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाचणीमुळे २ ऑगस्ट रोजी पीआरएस, इंटरनेट तिकीट यंत्रणा दुपारी २.१५ ते दु. ३.१५पर्यंत तात्पुरती बंद राहणार आहे. त्यानंतर दुपारी सव्वातीन ते रात्री पावणेबारापर्यंत पुन्हा आरक्षण केंद्र व ऑनलाइन यंत्रणा सक्रिय होणार आहे. त्यानंतर पुन्हा रात्री पावणे बारा ते रात्री १.२०पर्यंत ही यंत्रणा बंद राहील. मध्यरात्री १.२०नंतर सेवा पूर्ववत होईल. आपत्कालीन स्थितीत रेल्वे आरक्षण यंत्रणा योग्यपद्धतीने सुरू राहण्यासाठी ही यंत्रणा अद्ययावत केली जात असल्याचे क्रिस संस्थेचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील प्रवासी आरक्षण यंत्रणा (पीआरएसी) आपत्कालीन स्थितीतही उत्तम चालावी यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्सतर्फे (क्रिस) पीआरएस यंत्रणेत बदल केले जाणार आहेत. त्यानिमित्त घेतल्या जाणाऱ्या चाचणीसाठी गुरुवार, २ ऑगस्ट रोजी मुंबईतील कम्प्युटराइज्ड तिकीट यंत्रणा (पीआरएस) टप्प्याटप्प्याने बंद केली जाणार आहे. त्यामुळे पश्चिम, मध्य रेल्वेवरील तिकीट आरक्षण केंद्रे काही वेळासाठी बंद राहणार आहेत.
रेल्वे यंत्रणेतील तिकीट आरक्षणाचे मुख्य केंद्र मुंबईसह दिल्ली, चैन्नई, कोलकोता येथे असून एक डेटा केंद्र सिकंदराबाद येथेही आहे. आपत्कालीन स्थितीत तिकीट यंत्रणा कोलमडू नये, समस्या निर्माण होऊ नये यासाठी क्रिस संस्थेतर्फे या यंत्रणेत काही बदल केले जाणार आहे. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाचणीमुळे २ ऑगस्ट रोजी पीआरएस, इंटरनेट तिकीट यंत्रणा दुपारी २.१५ ते दु. ३.१५पर्यंत तात्पुरती बंद राहणार आहे. त्यानंतर दुपारी सव्वातीन ते रात्री पावणेबारापर्यंत पुन्हा आरक्षण केंद्र व ऑनलाइन यंत्रणा सक्रिय होणार आहे. त्यानंतर पुन्हा रात्री पावणे बारा ते रात्री १.२०पर्यंत ही यंत्रणा बंद राहील. मध्यरात्री १.२०नंतर सेवा पूर्ववत होईल. आपत्कालीन स्थितीत रेल्वे आरक्षण यंत्रणा योग्यपद्धतीने सुरू राहण्यासाठी ही यंत्रणा अद्ययावत केली जात असल्याचे क्रिस संस्थेचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी स्पष्ट केले.