मुंबई: रेल्वेच्या खासगीकरणाच्या नावाखाली केंद्र सरकारने 'टर्मिनस'च्या नावाखाली परळचे वर्कशॉप बंद पाडण्याचा घाट घातल्याचा आरोप करत त्याविरोधात नॅशनल रेल्वे मजदूर संघाने जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारचा हा डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेनेने शिवसेनेने पुढाकार घेऊन कामगारांच्या नोकऱ्या वाचवाव्यात अशी मागणीही यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली.
नॅशनल रेल्वे मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणू पी. नायर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कामगारांनी नुकताच परळ वर्कशॉपवर प्रचंड मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. मुंबईत पाच रेल्वे टर्मिनस असताना परळ रेल्वे वर्कशॉपच्या जागेवर आणखी एक टर्मिनस उभारण्याची काहीही गरज नाही. या टर्मिनसमुळे या भागात रहदारी आणि दाटीवाटीची भरच पडेल. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगतानाच वर्कशॉप बंद करून टर्मिनस उभारण्यातून वर्कशॉपमधील हजारो रेल्वे कामगारांच्या पोटावर पाय येणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत परळ वर्कशॉपचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होऊ देणार नाही, असा इशारा नायर यांनी दिला.
रेल्वे वर्कशॉप बंद करून परळ येथे गरज नसताना टर्मिनस उभे करण्यास शिवसेनेचे नेते, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनीही विरोध केला आहे, याकडे लक्ष वेधतानाच नायर यांनी सावंत यांचे आभार मानत या प्रश्नात शिवसेनेने पुढाकार घ्यावा, असं आवाहनही केलं. परळ वर्कशॉपच्या आधी रेल्वे मंत्रालयाने माटुंगा वर्कशॉपही बंद करण्याचे केंद्राने पाऊल उचलले होते. मात्र रेल्वे कामगारांच्या प्रखर विरोधामुळे सरकारला नमते घ्यावे लागले. त्यामुळे आठ हजार कामगारांची रोजीरोटी वाचली, असं सांगत आता परळचे वर्कशॉप बंद पाडण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी सज्ज व्हा, असं आवाहनही नायर यांनी केलं. या मोर्चात सुमारे तीन हजार रेल्वे कामगार सहभागी झाले होते.
नॅशनल रेल्वे मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणू पी. नायर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कामगारांनी नुकताच परळ वर्कशॉपवर प्रचंड मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. मुंबईत पाच रेल्वे टर्मिनस असताना परळ रेल्वे वर्कशॉपच्या जागेवर आणखी एक टर्मिनस उभारण्याची काहीही गरज नाही. या टर्मिनसमुळे या भागात रहदारी आणि दाटीवाटीची भरच पडेल. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगतानाच वर्कशॉप बंद करून टर्मिनस उभारण्यातून वर्कशॉपमधील हजारो रेल्वे कामगारांच्या पोटावर पाय येणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत परळ वर्कशॉपचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होऊ देणार नाही, असा इशारा नायर यांनी दिला.
रेल्वे वर्कशॉप बंद करून परळ येथे गरज नसताना टर्मिनस उभे करण्यास शिवसेनेचे नेते, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनीही विरोध केला आहे, याकडे लक्ष वेधतानाच नायर यांनी सावंत यांचे आभार मानत या प्रश्नात शिवसेनेने पुढाकार घ्यावा, असं आवाहनही केलं. परळ वर्कशॉपच्या आधी रेल्वे मंत्रालयाने माटुंगा वर्कशॉपही बंद करण्याचे केंद्राने पाऊल उचलले होते. मात्र रेल्वे कामगारांच्या प्रखर विरोधामुळे सरकारला नमते घ्यावे लागले. त्यामुळे आठ हजार कामगारांची रोजीरोटी वाचली, असं सांगत आता परळचे वर्कशॉप बंद पाडण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी सज्ज व्हा, असं आवाहनही नायर यांनी केलं. या मोर्चात सुमारे तीन हजार रेल्वे कामगार सहभागी झाले होते.