म. टा. प्रतिनिधी, मुंबई
प्रदीर्घ प्रतीक्षा करायला लावून आलेला व गेल्या गुरुवारपासून सलग तीन दिवस मुंबई-ठाणे परिसरावर संततधार धरणारा पाऊस या भागात मुक्कामास आल्याची सुवार्ता हवामान खात्याने शनिवारी दिली.
मुंबई व ठाणेकरांची शनिवारची सकाळ बरसणाऱ्या धारांसोबतच उजाडली. मुंबईत मरिन ड्राइव्ह, कुलाबा, फोर्ट, गिरगाव, महालक्ष्मी, भायखळा, लालबाग, परळ, वरळी, दादर, प्रभादेवी आणि सायन परिसरात पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. पूर्व उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे; तर, पश्चिम उपनगरात वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, बोरीवली आणि गोरेगाव येथेही मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या दणक्याने ठाण्यात घोडबंदर रोडवर, रुनवाल इस्टेट येथील भिंत कोसळून दहा कारचे जबर नुकसान झाले. इतरत्र नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
‘एकूण पावसाच्या स्थितीचा आम्ही आढावा घेत आहोत, मात्र तूर्तास प्राथमिक निरीक्षणांवरून मुंबई, कोकण, उर्वरीत राज्याचा काही भाग आणि गोवा येथे पाऊस कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत’, असे हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये धुवांधार पाऊस चालू आहे. रायगड जिल्ह्यातील बहुतांश नद्या धोक्याच्या पातळीच्या आसपास वाहत आहेत.
आजही मुसळधार?
शनिवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत मुंबई शहरात ५५.५०मिमी, पूर्व उपनगरांत ४७.४३ मिमी, आणि पश्चिम उपनगरांत ५६.०१ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबई, कोकण आणि गोवा पट्ट्यात आज, रविवारी काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
तलावक्षेत्रात किरकोळच
मुंबई शहरात चांगला पाऊस असला तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात मात्र तुरळक पाऊस होत आहे. गेल्या आठवडाभरातील पावसामुळे या तलावांतील स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. मात्र, येत्या काही दिवसांत धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा असल्याचे पालिका उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले.
वाहतुकीला फटका
मुसळधार पाऊस व काही तांत्रिक कारणे यांमुळे मध्य, हार्बर व पश्चिम अशा तीनही रेल्वे मार्गांवरील वाहतूक १०-१५ मिनिटे विलंबाने चालू होती. दादर टीटी आणि हिंदमाता या भागांत साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली. तर, दृश्यमानता कमी झाल्याने विमान उड्डाणेही अर्धा ते पाऊण तास उशिराने होत होती.
प्रदीर्घ प्रतीक्षा करायला लावून आलेला व गेल्या गुरुवारपासून सलग तीन दिवस मुंबई-ठाणे परिसरावर संततधार धरणारा पाऊस या भागात मुक्कामास आल्याची सुवार्ता हवामान खात्याने शनिवारी दिली.
मुंबई व ठाणेकरांची शनिवारची सकाळ बरसणाऱ्या धारांसोबतच उजाडली. मुंबईत मरिन ड्राइव्ह, कुलाबा, फोर्ट, गिरगाव, महालक्ष्मी, भायखळा, लालबाग, परळ, वरळी, दादर, प्रभादेवी आणि सायन परिसरात पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. पूर्व उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे; तर, पश्चिम उपनगरात वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, बोरीवली आणि गोरेगाव येथेही मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या दणक्याने ठाण्यात घोडबंदर रोडवर, रुनवाल इस्टेट येथील भिंत कोसळून दहा कारचे जबर नुकसान झाले. इतरत्र नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
‘एकूण पावसाच्या स्थितीचा आम्ही आढावा घेत आहोत, मात्र तूर्तास प्राथमिक निरीक्षणांवरून मुंबई, कोकण, उर्वरीत राज्याचा काही भाग आणि गोवा येथे पाऊस कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत’, असे हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये धुवांधार पाऊस चालू आहे. रायगड जिल्ह्यातील बहुतांश नद्या धोक्याच्या पातळीच्या आसपास वाहत आहेत.
आजही मुसळधार?
शनिवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत मुंबई शहरात ५५.५०मिमी, पूर्व उपनगरांत ४७.४३ मिमी, आणि पश्चिम उपनगरांत ५६.०१ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबई, कोकण आणि गोवा पट्ट्यात आज, रविवारी काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
तलावक्षेत्रात किरकोळच
मुंबई शहरात चांगला पाऊस असला तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात मात्र तुरळक पाऊस होत आहे. गेल्या आठवडाभरातील पावसामुळे या तलावांतील स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. मात्र, येत्या काही दिवसांत धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा असल्याचे पालिका उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले.
वाहतुकीला फटका
मुसळधार पाऊस व काही तांत्रिक कारणे यांमुळे मध्य, हार्बर व पश्चिम अशा तीनही रेल्वे मार्गांवरील वाहतूक १०-१५ मिनिटे विलंबाने चालू होती. दादर टीटी आणि हिंदमाता या भागांत साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली. तर, दृश्यमानता कमी झाल्याने विमान उड्डाणेही अर्धा ते पाऊण तास उशिराने होत होती.