मुंबई:
मुंबईतील मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे अनेक घर उद्धवस्त झाली आहेत. मुलांना चांगल्या शाळेत शिकवण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईत घेऊन आलेल्या रामविकास गौतमचे स्वप्नही या पावसामुळे भंगले आहे. रामविकासची दोन्ही मुलं मृत्यूमुखी पडली असून या छोट्याशा कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
चिमुकली प्रियांशी मात्र आईजवळ झोपली असल्यामुळे थोडक्यात बचावली आहे. 'आम्ही प्रचंड त्रासात आहोत. आम्हाला झालेल्या वेदनांहूनही जास्त मुलांना गमावल्याचा त्रास होतो आहे. रामविकास आणि त्यांची पत्नीला गंभीर जखमा झाल्या आहेत. पण ते येत नाही तोपर्यंत आम्ही मुलांचे मृतदेह देणार नाही अशी अट गोरेगाव येथील सिद्धांत रुग्णालयाने ठेवल्याने दोघंही धावत धावत रुग्णालयात पोहोचले. जखमी अवस्थेतच दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन दोघांनीही नंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार केले. रामविकासची पत्नी लक्ष्मी हिला मात्र यावेळी अश्रू अनावर झाले होते.