मुंबई
कोकणात कोट्यवधींचे रस्ते बांधल्यानंतर काही दिवसातच खड्डे पडतात कसे? असा सवाल करीत रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतर कंत्राटदारांना जाब विचारा असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना दिला. कोकणाकडे सर्वच राजकीय पक्षांकडून दुर्लक्ष झाल्याचेही ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रवींद्र नाट्य मंदिरात मुंबई, ठाणे व पालघर येथील मनसे कार्यकर्त्यांचा 'कोकणवासियांचा मेळावा' आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आंबेनळी दुर्घटनेतील बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली. गणपतीसाठी मुंबई, ठाण्याहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. कोकणात जाताना खड्ड्यांचे विघ्न गणेश भक्तांसमोर आहे. कोकणातील जागा बळकावण्यासाठी परप्रांतीयांनी कंबर कसली असून अनेक जागा त्यांनी बळकावल्या आहेत. कोकणात विध्वंसक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न होत आहे. कोकणची वाट लावणारे प्रकल्प जाणीवपूर्वक राबवले जात आहे, असा आरोप करीत त्यांनी जैतापूर आणि नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवला. कोकणच्या लोकांना जमिनी विकू नये, असे आवाहनही राज यांनी यावेळी केले.
कोट्यवधी रुपयांचे रस्ते बनवले जातात. परंतु, काही दिवसांनंतर या रस्त्यांवर खड्डे पडतात कसे? असा सवाल करुन राज म्हणाले की, जर रस्त्यावर खड्डा पडला तर सरळ रस्त्यांच्या कंत्राटदारांना जाब विचारा. शहरी भागांप्रमाणे ग्रामीण भागातील मनसे कार्यकर्त्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक गावातील मनसैनिकांना बळ देण्याचं काम मुंबईतील कार्यकर्त्यांनी करायला हवे, असेही राज यावेळी म्हणाले.
कोकणात कोट्यवधींचे रस्ते बांधल्यानंतर काही दिवसातच खड्डे पडतात कसे? असा सवाल करीत रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतर कंत्राटदारांना जाब विचारा असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना दिला. कोकणाकडे सर्वच राजकीय पक्षांकडून दुर्लक्ष झाल्याचेही ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रवींद्र नाट्य मंदिरात मुंबई, ठाणे व पालघर येथील मनसे कार्यकर्त्यांचा 'कोकणवासियांचा मेळावा' आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आंबेनळी दुर्घटनेतील बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली. गणपतीसाठी मुंबई, ठाण्याहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. कोकणात जाताना खड्ड्यांचे विघ्न गणेश भक्तांसमोर आहे. कोकणातील जागा बळकावण्यासाठी परप्रांतीयांनी कंबर कसली असून अनेक जागा त्यांनी बळकावल्या आहेत. कोकणात विध्वंसक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न होत आहे. कोकणची वाट लावणारे प्रकल्प जाणीवपूर्वक राबवले जात आहे, असा आरोप करीत त्यांनी जैतापूर आणि नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवला. कोकणच्या लोकांना जमिनी विकू नये, असे आवाहनही राज यांनी यावेळी केले.
कोट्यवधी रुपयांचे रस्ते बनवले जातात. परंतु, काही दिवसांनंतर या रस्त्यांवर खड्डे पडतात कसे? असा सवाल करुन राज म्हणाले की, जर रस्त्यावर खड्डा पडला तर सरळ रस्त्यांच्या कंत्राटदारांना जाब विचारा. शहरी भागांप्रमाणे ग्रामीण भागातील मनसे कार्यकर्त्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक गावातील मनसैनिकांना बळ देण्याचं काम मुंबईतील कार्यकर्त्यांनी करायला हवे, असेही राज यावेळी म्हणाले.