मुंबई:
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मराठा आंदोलनावरून राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. 'मराठा आरक्षण असो की अन्य काही. प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचं काय काम?,' असा सवाल करतानाच 'ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारनं सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये,' असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यातील भाजप सरकारला दिला आहे.
मराठा मोर्चाने बुधवारी मुंबईत पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडणारे एक निवेदन काढून राज्यसरकारला खडेबोल सुनावले आहेत. 'सरकारनं वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी. आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे? किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत? सरकारचं धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचं आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरंच भविष्यात रोजगार असणार आहे का? कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय? त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय? ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात,' अशी मागणी राज यांनी केली आहे.
सरकारला फक्त मते हवी आहेत
यावेळी राज यांनी मराठा तरुणांना भावनिक आवाहनही केलं आहे. 'प्रत्येकाच्या घरी त्याची वाट पाहणारी आई वडील, बायको-मुलं आहेत. त्यांचा विचार मनात असू द्या. जातीपातीच्या नावाखाली आपला मराठी समाज दुभंगणार नाही, याची काळजी घ्या आणि आपला खरा शत्रू ओळखा. आपल्यावर संकट आहे ते बाहेरून,' असं सांगतानाच 'सरकारला तुमचा जीव प्यारा नाही. सरकारला, मग ते आधीचे असो की आत्ताचे, फक्त तुमची मतं हवी आहेत. वास्तविक 'मराठा समाज' म्हणून इतके मोर्चे काढल्यावर सरकारनं ह्यावर तत्परतेनं भूमिका घ्यायला पाहिजे होती, आपणच दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तातडीनं करायला हवी होती. पण त्यांनी तसं केलं नाही. लोकांच्या भावनांशी ते फक्त खेळत राहिले,' अशी टीका त्यांनी केली आहे.
>> काल मात्र काकासाहेब शिंदे ह्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव समर्पित केला आणि घडू नये ते घडलं. अर्थात असं असलं तरी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की ह्यापुढे एकाही 'मराठी', मग तो मराठा असेल, धनगर, आगरी असेल, वंजारी असेल, ब्राह्मण किंवा दलित असेल,कुठल्या का जातीचा असेना, कुठल्याही मराठी तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये. आपल्याला 'मराठी' म्हणून ते परवडणारे नाही.
>> शिवाजी महाराज म्हणाले होते की 'हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा', आता सध्याची परिस्थिती पाहिली की वाटतं: 'आपण जातीजातीत भांडत रहावे, ही तो परप्रांतीयांची इच्छा.' त्यामुळे आपापसातली भांडणं बाजूला ठेवा. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी मला तुमच्यातील प्रत्येकाची साथ हवी आहे. हो, प्रत्येकाची! आणि म्हणून उगाच जीवाचं बरंवाईट करून घेऊ नका.
>> सरकारला 'शांतता आणि सुव्यवस्था' सांभाळता येत नाही हे स्पष्ट दिसतं आहे. त्यांची बेजबाबदार विधानं ह्याची साक्ष आहेत. आता पुन्हा काही आश्वासनं देऊन प्रश्न पुढे ढकलण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे किंवा न्यायालयाचं कारण पुढे करून त्यांना प्रश्न मात्र तसाच ठेवायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मराठा आंदोलनावरून राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. 'मराठा आरक्षण असो की अन्य काही. प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचं काय काम?,' असा सवाल करतानाच 'ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारनं सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये,' असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यातील भाजप सरकारला दिला आहे.
मराठा मोर्चाने बुधवारी मुंबईत पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडणारे एक निवेदन काढून राज्यसरकारला खडेबोल सुनावले आहेत. 'सरकारनं वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी. आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे? किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत? सरकारचं धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचं आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरंच भविष्यात रोजगार असणार आहे का? कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय? त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय? ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात,' अशी मागणी राज यांनी केली आहे.
सरकारला फक्त मते हवी आहेत
यावेळी राज यांनी मराठा तरुणांना भावनिक आवाहनही केलं आहे. 'प्रत्येकाच्या घरी त्याची वाट पाहणारी आई वडील, बायको-मुलं आहेत. त्यांचा विचार मनात असू द्या. जातीपातीच्या नावाखाली आपला मराठी समाज दुभंगणार नाही, याची काळजी घ्या आणि आपला खरा शत्रू ओळखा. आपल्यावर संकट आहे ते बाहेरून,' असं सांगतानाच 'सरकारला तुमचा जीव प्यारा नाही. सरकारला, मग ते आधीचे असो की आत्ताचे, फक्त तुमची मतं हवी आहेत. वास्तविक 'मराठा समाज' म्हणून इतके मोर्चे काढल्यावर सरकारनं ह्यावर तत्परतेनं भूमिका घ्यायला पाहिजे होती, आपणच दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तातडीनं करायला हवी होती. पण त्यांनी तसं केलं नाही. लोकांच्या भावनांशी ते फक्त खेळत राहिले,' अशी टीका त्यांनी केली आहे.
>> काल मात्र काकासाहेब शिंदे ह्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव समर्पित केला आणि घडू नये ते घडलं. अर्थात असं असलं तरी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की ह्यापुढे एकाही 'मराठी', मग तो मराठा असेल, धनगर, आगरी असेल, वंजारी असेल, ब्राह्मण किंवा दलित असेल,कुठल्या का जातीचा असेना, कुठल्याही मराठी तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये. आपल्याला 'मराठी' म्हणून ते परवडणारे नाही.
>> शिवाजी महाराज म्हणाले होते की 'हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा', आता सध्याची परिस्थिती पाहिली की वाटतं: 'आपण जातीजातीत भांडत रहावे, ही तो परप्रांतीयांची इच्छा.' त्यामुळे आपापसातली भांडणं बाजूला ठेवा. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी मला तुमच्यातील प्रत्येकाची साथ हवी आहे. हो, प्रत्येकाची! आणि म्हणून उगाच जीवाचं बरंवाईट करून घेऊ नका.
>> सरकारला 'शांतता आणि सुव्यवस्था' सांभाळता येत नाही हे स्पष्ट दिसतं आहे. त्यांची बेजबाबदार विधानं ह्याची साक्ष आहेत. आता पुन्हा काही आश्वासनं देऊन प्रश्न पुढे ढकलण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे किंवा न्यायालयाचं कारण पुढे करून त्यांना प्रश्न मात्र तसाच ठेवायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.