मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक स्वतंत्र गट तयार करून शिवसेनेसोबत गेल्यानं, किंबहुना सेनेनं त्यांना आपल्या गळाला लावल्यानं ताकही फुंकून पिण्याचा सावध पवित्रा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अन्य महापालिकांमधील मनसेच्या नगरसेवकांना भेटून ते त्यांच्याशी 'मनसे' संवाद साधणार असल्याचं कळतं.
पुणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचे अनुक्रमे ३, ५ आणि १० नगरसेवक आहेत. त्या सर्वांना विश्वासात घेऊन, त्यांच्या तक्रारी-सूचना जाणून घ्यायचं राज यांनी ठरवलंय.
दोन दिवसांपूर्वी शिवसेनेनं राज ठाकरेंना 'जोर का झटका' दिला होता. एक नगरसेवक वगळता मनसेच्या सर्व नगरसेवकांनी राज यांना 'जय महाराष्ट्र' करून शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. मनसेतील 'राजे'शाहीला वैतागून हे नगरसेवक आपल्यासोबत आल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. मनसेच्या बंडखोर नगरसेवकांच्या गटाचे नेते दिलीप लांडे यांनीही अन्याय-अपमानाचं कारण दिलंय. मात्र, शिवसेनेनं ३० कोटी रुपये देऊन आपल्या सहा शिलेदारांना फोडल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. उद्धव यांनी नीच राजकारण केल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. त्यातून त्यांची उद्विग्नता सहज लक्षात येते. पण त्याचवेळी, या प्रकरणातून राज यांनी धडाही घेतल्याचं दिसतंय. एकीकडे नव्याने पक्षबांधणीचा प्रयत्न करत असताना, ही गळती परवडणारी नाही, हे ओळखून त्यांनी हालचाली सुरू केल्याचं समजतं.
राज्यातील अन्य महापालिकांमधील मनसेच्या नगरसेवकांशी 'मन की बात' करण्यासाठी ते लवकरच पुणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवलीचा दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या नगरसेवकांचं म्हणणं ऐकून त्यांच्या मनात नाराजी असल्यास ती दूर करण्याचा प्रयत्न राज करणार आहेत. त्यात आता नगरसेवक त्यांच्याकडे काय आणि कुणाबद्दल तक्रार करतात, यावर बरंच काही अवलंबून आहे.
मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक स्वतंत्र गट तयार करून शिवसेनेसोबत गेल्यानं, किंबहुना सेनेनं त्यांना आपल्या गळाला लावल्यानं ताकही फुंकून पिण्याचा सावध पवित्रा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अन्य महापालिकांमधील मनसेच्या नगरसेवकांना भेटून ते त्यांच्याशी 'मनसे' संवाद साधणार असल्याचं कळतं.
पुणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचे अनुक्रमे ३, ५ आणि १० नगरसेवक आहेत. त्या सर्वांना विश्वासात घेऊन, त्यांच्या तक्रारी-सूचना जाणून घ्यायचं राज यांनी ठरवलंय.
दोन दिवसांपूर्वी शिवसेनेनं राज ठाकरेंना 'जोर का झटका' दिला होता. एक नगरसेवक वगळता मनसेच्या सर्व नगरसेवकांनी राज यांना 'जय महाराष्ट्र' करून शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. मनसेतील 'राजे'शाहीला वैतागून हे नगरसेवक आपल्यासोबत आल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. मनसेच्या बंडखोर नगरसेवकांच्या गटाचे नेते दिलीप लांडे यांनीही अन्याय-अपमानाचं कारण दिलंय. मात्र, शिवसेनेनं ३० कोटी रुपये देऊन आपल्या सहा शिलेदारांना फोडल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. उद्धव यांनी नीच राजकारण केल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. त्यातून त्यांची उद्विग्नता सहज लक्षात येते. पण त्याचवेळी, या प्रकरणातून राज यांनी धडाही घेतल्याचं दिसतंय. एकीकडे नव्याने पक्षबांधणीचा प्रयत्न करत असताना, ही गळती परवडणारी नाही, हे ओळखून त्यांनी हालचाली सुरू केल्याचं समजतं.
राज्यातील अन्य महापालिकांमधील मनसेच्या नगरसेवकांशी 'मन की बात' करण्यासाठी ते लवकरच पुणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवलीचा दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या नगरसेवकांचं म्हणणं ऐकून त्यांच्या मनात नाराजी असल्यास ती दूर करण्याचा प्रयत्न राज करणार आहेत. त्यात आता नगरसेवक त्यांच्याकडे काय आणि कुणाबद्दल तक्रार करतात, यावर बरंच काही अवलंबून आहे.