अ‍ॅपशहर

रेल्वेनंतर राज ठाकरेंचा महापालिकेवर 'मोर्चा'

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेसंबंधी समस्या आणि बेकायदा फेरीवाले आदी मुद्द्यांवर रेल्वेच्या मुख्यालयावर धडक दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेकडे आपला मोर्चा वळवला आहे. बेकायदा फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाई करा, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली.

Maharashtra Times 11 Oct 2017, 2:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raj thackeray met mumbai municipal commissioner over illegal hawkers issue
रेल्वेनंतर राज ठाकरेंचा महापालिकेवर 'मोर्चा'


एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेसंबंधी समस्या आणि बेकायदा फेरीवाले आदी मुद्द्यांवर रेल्वेच्या मुख्यालयावर धडक दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेकडे आपला मोर्चा वळवला आहे. बेकायदा फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाई करा, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली.

राज ठाकरे यांनी मेहता यांची भेट घेऊन अतिक्रमणे, बेकायदा फेरीवाले आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. तसंच अनेक मागण्यांसंबंधी निवेदनही दिलं. बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असं त्यांनी मेहता यांना सांगितलं. ज्या ठिकाणी अतिक्रमणं होतात. त्या ठिकाणांवर पालिकेच्या संबंधित कार्यालयांच्या दूरध्वनी क्रमांकाचे फलक लावण्यात यावेत. त्या क्रमांकांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांचे फोटो पाठवल्यास कारवाई केली जाते, हे लोकांना माहित झाल्यास चांगलं होईल, असंही राज म्हणाले. बेकायदा फेरीवाल्यांमध्ये मराठी भाषिकही आहेत असा प्रश्न विचारला असता, कुणाच्या रोजगारावर लाथ मारण्याचा उद्देश नाही. सामान्य माणूस कर भरतो. रेल्वेनं प्रवास करायचा आहे. पदपथावरून चालायचं आहे. तिथे कुणी बेकायदा फेरीवाले बसत असतील तर ते अयोग्य आहे. पदपथावरून चालणारेही मराठीच आहेत. मुळात अधिकृत फेरीवाल्यांची संख्या खूपच कमी आहे. अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाणच अधिक आहे. अनधिकृत फेरीवाले किती आहेत याचा शोध घेऊन कारवाई करायलाच हवी, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज