अ‍ॅपशहर

दाऊदवर एवढी वाईट वेळ आलीय का?: राज

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी फोनाफोनी आणि जमीन घोटाळ्यांच्या आरोपावरून मंत्रिपद गमावलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत टीका केली. 'दाऊद इब्राहिम एकनाथ खडसेंना कॉल करतो एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली आहे का,' असा टोला राज यांनी हाणला.

Maharashtra Times 26 Jun 2016, 11:44 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raj thackeray mocks khadse
दाऊदवर एवढी वाईट वेळ आलीय का?: राज


कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी फोनाफोनी आणि जमीन घोटाळ्यांच्या आरोपावरून मंत्रिपद गमावलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत टीका केली. 'दाऊद इब्राहिम एकनाथ खडसेंना कॉल करतो एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली आहे का,' असा टोला राज यांनी हाणला.

यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी खडसे प्रकरणावर भाष्य केले. 'दाऊद पाकिस्तानातून स्वतःची यंत्रणा सांभाळतो. तो तिथून खडसेंना कशाला फोन करेल? एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली आहे का, असं राज म्हणाले. आपल्याकडे काहीही झालं की लगेच तर्कवितर्क लावले जातात. सगळी मज्जा मज्जा चालली आहे,' असं राज म्हणाले.

'महाराष्ट्र नेहमी देशाचा विचार करतो. इतर राज्यं मात्र स्वत:चा विचार आधी करतात. त्यामुळं यूपीएससी व एमपीएससी परीक्षेतल्या यशवंतांनी महाराष्ट्राचा विचार सगळ्यात आधी करावा,' असं आवाहनही राज यांनी यावेळी केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज