मुंबईः ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल, यांची मस्ती उतरवली पाहिजे', अशा शब्दांत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. (Raj Thackeray Latest News)
राज ठाकरे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 'महाराष्ट्रातील एका शासकीय अधिकाऱ्याची बोटं छाटता. हिंमत कशी होते यांची. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. यांची सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही. तेव्हा यांना कळेल. आंदोलनं आणि निषेध करुन ही लोकं सुधारणार नाहीत', असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
वाचाः नगर जिल्ह्यातील 'या' गावात ढगफुटीसदृश पाऊस, ग्रामस्थांनी रात्र जागून काढली
'आज पकडलेत उद्या जामीन होईल. सरकार कशासाठी आहे?, सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कोणाची हिंमत नाही झाली बोटं छाटायची. हे सहीसलामत जामीनावर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल,' असा सज्जड दम राज ठाकरेंनी भरला आहे.
वाचाः कन्नड घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, पोलिसांनी सांगितले पर्यायी मार्ग
नेमकं काय प्रकरण?
घोडबंदर भागातील कासारवडवली येथे सोमवारी सायंकाळी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका भाजी विक्रेत्याने महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे तुटली असून त्यांच्या डोक्यालाही लागले आहे. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अंगरक्षकावरही हल्ला केल्याने त्याच्याही हाताचे एक बोट तुटले आहे. या दोघांवरही ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर भाजी विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाचाः 'ठाकरे सरकारचे नियम आमदार- खासदारांच्या मुलांना लागू होत नाहीत का?'
राज ठाकरे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 'महाराष्ट्रातील एका शासकीय अधिकाऱ्याची बोटं छाटता. हिंमत कशी होते यांची. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. यांची सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही. तेव्हा यांना कळेल. आंदोलनं आणि निषेध करुन ही लोकं सुधारणार नाहीत', असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
वाचाः नगर जिल्ह्यातील 'या' गावात ढगफुटीसदृश पाऊस, ग्रामस्थांनी रात्र जागून काढली
'आज पकडलेत उद्या जामीन होईल. सरकार कशासाठी आहे?, सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कोणाची हिंमत नाही झाली बोटं छाटायची. हे सहीसलामत जामीनावर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल,' असा सज्जड दम राज ठाकरेंनी भरला आहे.
वाचाः कन्नड घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, पोलिसांनी सांगितले पर्यायी मार्ग
नेमकं काय प्रकरण?
घोडबंदर भागातील कासारवडवली येथे सोमवारी सायंकाळी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका भाजी विक्रेत्याने महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे तुटली असून त्यांच्या डोक्यालाही लागले आहे. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अंगरक्षकावरही हल्ला केल्याने त्याच्याही हाताचे एक बोट तुटले आहे. या दोघांवरही ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर भाजी विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाचाः 'ठाकरे सरकारचे नियम आमदार- खासदारांच्या मुलांना लागू होत नाहीत का?'