म. टा. प्रतिनिधी, मुंबई
- सूत्रधार कैलाश राजपूत देशाबाहेर
- अलीकडे पकडलेल्या अब्रानीचे तपासात असहकार्य
- महसूल गुप्तचर संचालनालयाचा तस्करी साखळी शोधण्याचा प्रयत्न
मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये अंमली पदार्थांचे जाळे विणणारी कैलाश राजपूत टोळी तपास संस्थांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अत्यंत नियोजनबद्धरितीने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या या टोळीचा मुख्य सूत्रधार कैलाश राजपूत देशाबाहेर पळाला आहे. पण त्याच्या देशांतर्गत कारवाया सुरूच आहेत. अटकेत असलेल्या त्याच्या साथीदाराकडूनही महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) माहिती मिळत नसल्याने आव्हान वाढले आहे.
कैलाश राजपूत याने मागील आठ ते दहा वर्षांत अनेक लहान-मोठे व्यापारी व उद्योजकांना घेऊन अंमली पदार्थांचे जाळे उभे केले आहे. अशाच एका प्रकरणात त्याला अटकही झाली होती. पण सन २०१३ मध्ये तो जामिनावर सुटला. भारतात राहून काम केल्यास धोका असल्याचे लक्षात येताच तो देशाबाहेर पळाला व दुबईतून तस्करीचे व्यवहार करू लागला. याचदरम्यान डीआरआयने सन २०१५मध्ये दिल्लीत मोठी कारवाई केली. त्यात त्याचे नाव आले होते. सन २०१७मध्येही एका प्रकरणाच्या आरोपपत्रात त्याचे नाव आहे. तर आता मागीलवर्षी अंमली पदार्थविरोधी दलाने केलेल्या कारवाईमध्येही मुंबईसह देशातील अंमली पदार्थ तस्करीचा म्होरक्या व खरा सूत्रधार हा कैलाश राजपूतच असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर डीआरआयच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने दोन आठवड्यांपूर्वीच सापळा रचून वसईतून वसिम अब्रानी याला अटक केली. वसिम हा कैलाशचा उजवा हात असल्याचे बोलले जाते. पण त्याच्या अटकेनंतरही डीआरआयला अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
वसिम हा मूळ कांदे-बटाट्याचा निर्यातक आहे. कांदे-बटाटे खराब होऊ नये म्हणून तो रसायनांचा वापर करायचा. यानिमित्ताने तो यूएईमध्ये कैलाशच्या संपर्कात आला व तिथून फेनेथिल, पिपरेडोन, मेफेड्रोन यासारख्या अंमली पदार्थांच्या तस्करीत उतरला. यामुळेच त्याची अटक डीआरआयसाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यामुळे तपास संस्थांना कैलाशपर्यंत पोहोचता येणार आहे. त्याचवेळी ही टोळी नेमकी तस्करी करते कशी? अंमली पदार्थ तयार कुठे होतात? टोळीतील अन्य सदस्य यांची माहिती काढण्याचा डीआरआयचा प्रयत्न आहे. पण वसिमकडून याबाबत असहकार्य मिळत नसल्याने डीआरआयची डोकेदुखी वाढली आहे.
तीन टप्प्यात तस्करी
ही टोळी साधारण तीन टप्प्यात तस्करी करीत असल्याचे दिसून आले आहे. पहिल्या टप्प्यात कच्चा माल, दुसऱ्या टप्प्यात कच्च्या मालापासून अंमली पदार्थ तयार करणे व त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ते हस्तकांमार्फत अनोळखी ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखानाही मुंबईतच असल्याची माहिती असून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. डीआरआय मुंबईचे सह संचालक समीर वानखेडे यांनीही त्याला 'मटा'शी बोलताना दुजोरा दिला.
राजकीय संबंध
अंमली पदार्थांप्रकरणी राज्यातील एका पक्षाच्या ज्येष्ठ आमदारांच्या भाच्याला डीआरआयने दिल्लीत अटक केली होती. त्या प्रकरणातही कैलाश राजपूतचे नाव होतेच. यावरून राजपूतचे राजकीय संबंध असल्याचेही बोलले जाते.
- सूत्रधार कैलाश राजपूत देशाबाहेर
- अलीकडे पकडलेल्या अब्रानीचे तपासात असहकार्य
- महसूल गुप्तचर संचालनालयाचा तस्करी साखळी शोधण्याचा प्रयत्न
मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये अंमली पदार्थांचे जाळे विणणारी कैलाश राजपूत टोळी तपास संस्थांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अत्यंत नियोजनबद्धरितीने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या या टोळीचा मुख्य सूत्रधार कैलाश राजपूत देशाबाहेर पळाला आहे. पण त्याच्या देशांतर्गत कारवाया सुरूच आहेत. अटकेत असलेल्या त्याच्या साथीदाराकडूनही महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) माहिती मिळत नसल्याने आव्हान वाढले आहे.
कैलाश राजपूत याने मागील आठ ते दहा वर्षांत अनेक लहान-मोठे व्यापारी व उद्योजकांना घेऊन अंमली पदार्थांचे जाळे उभे केले आहे. अशाच एका प्रकरणात त्याला अटकही झाली होती. पण सन २०१३ मध्ये तो जामिनावर सुटला. भारतात राहून काम केल्यास धोका असल्याचे लक्षात येताच तो देशाबाहेर पळाला व दुबईतून तस्करीचे व्यवहार करू लागला. याचदरम्यान डीआरआयने सन २०१५मध्ये दिल्लीत मोठी कारवाई केली. त्यात त्याचे नाव आले होते. सन २०१७मध्येही एका प्रकरणाच्या आरोपपत्रात त्याचे नाव आहे. तर आता मागीलवर्षी अंमली पदार्थविरोधी दलाने केलेल्या कारवाईमध्येही मुंबईसह देशातील अंमली पदार्थ तस्करीचा म्होरक्या व खरा सूत्रधार हा कैलाश राजपूतच असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर डीआरआयच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने दोन आठवड्यांपूर्वीच सापळा रचून वसईतून वसिम अब्रानी याला अटक केली. वसिम हा कैलाशचा उजवा हात असल्याचे बोलले जाते. पण त्याच्या अटकेनंतरही डीआरआयला अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
वसिम हा मूळ कांदे-बटाट्याचा निर्यातक आहे. कांदे-बटाटे खराब होऊ नये म्हणून तो रसायनांचा वापर करायचा. यानिमित्ताने तो यूएईमध्ये कैलाशच्या संपर्कात आला व तिथून फेनेथिल, पिपरेडोन, मेफेड्रोन यासारख्या अंमली पदार्थांच्या तस्करीत उतरला. यामुळेच त्याची अटक डीआरआयसाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यामुळे तपास संस्थांना कैलाशपर्यंत पोहोचता येणार आहे. त्याचवेळी ही टोळी नेमकी तस्करी करते कशी? अंमली पदार्थ तयार कुठे होतात? टोळीतील अन्य सदस्य यांची माहिती काढण्याचा डीआरआयचा प्रयत्न आहे. पण वसिमकडून याबाबत असहकार्य मिळत नसल्याने डीआरआयची डोकेदुखी वाढली आहे.
तीन टप्प्यात तस्करी
ही टोळी साधारण तीन टप्प्यात तस्करी करीत असल्याचे दिसून आले आहे. पहिल्या टप्प्यात कच्चा माल, दुसऱ्या टप्प्यात कच्च्या मालापासून अंमली पदार्थ तयार करणे व त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ते हस्तकांमार्फत अनोळखी ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखानाही मुंबईतच असल्याची माहिती असून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. डीआरआय मुंबईचे सह संचालक समीर वानखेडे यांनीही त्याला 'मटा'शी बोलताना दुजोरा दिला.
राजकीय संबंध
अंमली पदार्थांप्रकरणी राज्यातील एका पक्षाच्या ज्येष्ठ आमदारांच्या भाच्याला डीआरआयने दिल्लीत अटक केली होती. त्या प्रकरणातही कैलाश राजपूतचे नाव होतेच. यावरून राजपूतचे राजकीय संबंध असल्याचेही बोलले जाते.