म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : 'राज्यसभा निवडणुकीची पूर्ण आणि पूर्व तयारी झाली असून सर्व रणनीती, कार्यपद्धतीची ब्लू प्रिंट तयार आहे. भाजपचा तिसरा उमेदवार जिंकणारच आणि शिवसेनेच्या संजयचा पराभव होणारच', असा दावा भाजपचे नेते आशीष शेलार यांनी रविवारी केला.
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष बैठक मुंबईतील कार्यालयात पार पडली. त्यानंतर ते बोलत होते. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह केंद्रीय वाणिज्यमंत्री आणि राज्यसभा निवडणुकीतील भाजप उमेदवार पीयूष गोयल, चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
'रोज सकाळी उठून बोलणाऱ्या संजय राऊत यांचे बोलणे हे बालीश आणि पोरकटपणाचे आहे. त्यांना कदाचित स्वपक्षाचा पराभव दिसत असेल. त्यामुळे ते असे बोलत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचा त्यांचा आरोप बिनबुडाचा आहे. पराभव दिसत असल्यानेच राऊत यांनी आतापासून कारणांची पेरणी करण्याचे काम सुरू केले आहे', असे शेलार म्हणाले. राज्यात घोडेबाजार सुरू असल्याच्या राऊत यांच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. 'राऊत तबेल्यात राहत असल्यामुळे त्यांना घोडेबाजार दिसत असावा', असे ते म्हणाले.
प्रतिष्ठा पणाला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आघाडीतील आमदारांशी साधणार संवाद
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष बैठक मुंबईतील कार्यालयात पार पडली. त्यानंतर ते बोलत होते. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह केंद्रीय वाणिज्यमंत्री आणि राज्यसभा निवडणुकीतील भाजप उमेदवार पीयूष गोयल, चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
'रोज सकाळी उठून बोलणाऱ्या संजय राऊत यांचे बोलणे हे बालीश आणि पोरकटपणाचे आहे. त्यांना कदाचित स्वपक्षाचा पराभव दिसत असेल. त्यामुळे ते असे बोलत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचा त्यांचा आरोप बिनबुडाचा आहे. पराभव दिसत असल्यानेच राऊत यांनी आतापासून कारणांची पेरणी करण्याचे काम सुरू केले आहे', असे शेलार म्हणाले. राज्यात घोडेबाजार सुरू असल्याच्या राऊत यांच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. 'राऊत तबेल्यात राहत असल्यामुळे त्यांना घोडेबाजार दिसत असावा', असे ते म्हणाले.
प्रतिष्ठा पणाला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आघाडीतील आमदारांशी साधणार संवाद