अ‍ॅपशहर

ramdas athawale : पार्श्वगायक मोहम्मद रफी यांना भारतरत्न द्या; आठवलेंची पंतप्रधानांकडे मागणी

दिवंगत पार्श्वगायक मोहम्मद रफी (mohammad rafi) यांनाही भारतरत्न (bharat ratna) पुरस्कार द्या, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी केली आहे. आठवले यांनी या मागणीचे पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार असल्याचं सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Aug 2020, 4:04 pm
मुंबई: महान साहित्यिक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत पार्श्वगायक मोहम्मद रफी यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. आठवले यांनी या मागणीचे पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार असल्याचं सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramdas athawale


मोहम्मद रफी यांचे सिनेसृष्टीतील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या प्रभावामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अनेक गायक तयार झाले आहेत. त्यामुळे मोहम्मद रफी यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा. महाराष्ट्र सरकारने रफींना भारतरत्न देण्यासाठीची शिफारस केंद्र सरकारकडे करावी. तसेच आपण स्वत: पंतप्रधानांना पत्र लिहून मोहम्मद रफींना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी लावून धरू, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

पद्मश्री मोहम्मद रफी यांनी अजरामर गीते गाऊन जनमानसाच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक म्हणून मोहम्मद रफी यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचा नुकताच ३१ जुलै रोजी ४० वा स्मृतिदिन संपन्न झाला. त्यानिमित्त रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि कपिल कला केंद्रचे कपिल खरवार यांनी केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन दिवंगत पार्श्वगायक मोहम्मद रफी यांना भारतरत्न किताब द्यावा या मागणीचे निवेदन दिले.

प्रभू रामचंद्र कुणाच्या सातबाऱ्यावर नाही; आव्हाडांचा भाजपला टोला

दरम्यान, दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, भीम आर्मी संघटना आणि शिवसेनेनेही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी जुनीच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात आहे. यंदाही सर्वच राजकीय पक्षांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे अण्णा भाऊ साठेंसह मोहम्मद रफी यांनाही सरकार भारतरत्न पुरस्कार देते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

६ ऑगस्टपासून सेल; फोनवर ४० टक्के तर TVवर ५० टक्के सूट

लॉकडाऊनमधील सेलिब्रिटी पार्ट्या कोणत्या मंत्र्यांच्या आशीर्वादाने?: शेलार

महत्वाचे लेख