म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'आरेच्या जंगलातील झाडांची रात्री-बेरात्री कत्तल करणारे हे सरकार पाहिले की, खुनी रामन राघवची आठवण येते. हे सरकार रामन राघवच आहे,' अशी टीका गुरुवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माहीम येथील संदीप देशपांडे यांच्या प्रचारसभेत बोलताना केली.
राज्यात गेल्या पाच वर्षांमध्ये १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याचा अर्थ दर तीन तासाला एक आत्महत्या झाली. आता पीएमसीतील तीन लोकांना पैसे बुडल्याच्या धक्क्याने प्राण गमवावे लागले असताना एका खातेदार महिलेनेही आत्महत्या केली आहे, असे सांगून या मंदीबाबत सरकार ठोस उपाय योजना करण्याऐवजी मंदी वाढेल, असेच निर्णय घेत असल्याचे ठाकरे म्हणाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या गुरुवारच्या पत्रकार परिषदेचा हवाला देऊन राज ठाकरे म्हणाले की, येणाऱ्या काळात या मंदीचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसणार असून त्यातून लाखो जणांच्या नोकऱ्या जाणार हे स्पष्ट आहे.
जाहीरनाम्यात दिलेली वचने शिवसेना-भाजपचे सरकार विसरते. गेल्या वेळी टोलमाफीचे दिलेले आश्वासन असेच हवेत विरून गेले. मग आत्ता शिवसेनेने दिलेले १० रुपयात जेवणाच्या थाळीचे आश्वासनही तसेच संपले तर काय, असा सवाल राज यांनी केला. सर्वाधिक कर भरणाऱ्या मुंबईकरांचे जीव खड्ड्यात पडून जात असतील व तरीही लोकांना राग येत नसेल, तर अशा थंड समाजाकडून काहीही घडू शकत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
गवत लावणार का?
सत्तेत आल्यावर आरेला पुन्हा जंगल घोषित करू, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विधानाचीही त्यांनी खिल्ली उडवली. आता झाडे तोडून झाल्यावर काय तिथे गवत लावणार का, असा सवाल त्यांनी केला.
'आरेच्या जंगलातील झाडांची रात्री-बेरात्री कत्तल करणारे हे सरकार पाहिले की, खुनी रामन राघवची आठवण येते. हे सरकार रामन राघवच आहे,' अशी टीका गुरुवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माहीम येथील संदीप देशपांडे यांच्या प्रचारसभेत बोलताना केली.
राज्यात गेल्या पाच वर्षांमध्ये १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याचा अर्थ दर तीन तासाला एक आत्महत्या झाली. आता पीएमसीतील तीन लोकांना पैसे बुडल्याच्या धक्क्याने प्राण गमवावे लागले असताना एका खातेदार महिलेनेही आत्महत्या केली आहे, असे सांगून या मंदीबाबत सरकार ठोस उपाय योजना करण्याऐवजी मंदी वाढेल, असेच निर्णय घेत असल्याचे ठाकरे म्हणाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या गुरुवारच्या पत्रकार परिषदेचा हवाला देऊन राज ठाकरे म्हणाले की, येणाऱ्या काळात या मंदीचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसणार असून त्यातून लाखो जणांच्या नोकऱ्या जाणार हे स्पष्ट आहे.
जाहीरनाम्यात दिलेली वचने शिवसेना-भाजपचे सरकार विसरते. गेल्या वेळी टोलमाफीचे दिलेले आश्वासन असेच हवेत विरून गेले. मग आत्ता शिवसेनेने दिलेले १० रुपयात जेवणाच्या थाळीचे आश्वासनही तसेच संपले तर काय, असा सवाल राज यांनी केला. सर्वाधिक कर भरणाऱ्या मुंबईकरांचे जीव खड्ड्यात पडून जात असतील व तरीही लोकांना राग येत नसेल, तर अशा थंड समाजाकडून काहीही घडू शकत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
गवत लावणार का?
सत्तेत आल्यावर आरेला पुन्हा जंगल घोषित करू, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विधानाचीही त्यांनी खिल्ली उडवली. आता झाडे तोडून झाल्यावर काय तिथे गवत लावणार का, असा सवाल त्यांनी केला.