मुंबई: बाबरी मशीद पडली तेव्हा आपण अयोध्येत होतो, असा दावा करणारे भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर अब्दुल सत्तार यांच्यामुळे तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. कारण, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी बाबरी पडली तेव्हा रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) माझ्यासोबत औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात होते, असा दावा केला आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याविषयी साशंकता उपस्थित झाली आहे.रावसाहेब दानवे त्यावेळी खरंच अयोध्येला गेले होते का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता दानवे काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Raosaheb Danve was with me in Sillod Aurangabad when Babri Masjid fall down)
सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये बाबरी मशीद कोणी पाडली, यावरून श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, बाबरी पडली तेव्हा मी त्याठिकाणी होतो. तेव्हा अयोध्येत एकही शिवसैनिक नव्हता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला खोटं सांगून त्यांची दिशाभूल करू नये, असे दानवे यांनी म्हटले होते. मात्र, आता अब्दुल सत्तार यांच्या दाव्यामुळे दानवेच अडचणीत आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम मुंबईतील भाजपच्या बुस्टर सभेत बाबरी मशिदीसंदर्भात विधान केले होते. बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा अयोध्येत एकही शिवसैनिक नव्हता, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या दाव्यानंतर शिवसेनेचे नेते आक्रमक झाले होते. बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिकच आघाडीवर होते, असा प्रतिदावा सेनेकडून करण्यात आला होता. मात्र, फडणवीसांनी रविवारी मुंबईत झालेल्या सभेत शिवसेनेचा दावा पुन्हा एकदा खोडून काढला. बाबरी पडली तेव्हा त्याठिकाणी शिवसैनिक नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.कोठारी बंधूंनी बाबरीवर तेव्हा भगवा फडकवला. बाबरीच्या संघर्षात तेव्हा मी अनेक दिवस तुरूंगात होतो. बदायूच्या तुरुंगात अनेक दिवस मी काढले. आम्ही अयोध्येत गेलो. शेवटपर्यंत शिवसैनिकांची वाट पाहत राहिलो. पण हे शेवटपर्यंत आले नाहीत. बाबरी आम्हीच पाडली, असेही फडणवीस म्हणाले.
सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये बाबरी मशीद कोणी पाडली, यावरून श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, बाबरी पडली तेव्हा मी त्याठिकाणी होतो. तेव्हा अयोध्येत एकही शिवसैनिक नव्हता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला खोटं सांगून त्यांची दिशाभूल करू नये, असे दानवे यांनी म्हटले होते. मात्र, आता अब्दुल सत्तार यांच्या दाव्यामुळे दानवेच अडचणीत आले आहेत.