मुंबई:
रत्नागिरीतील तिवरे धरण दुर्घटनेतील मृत्यू हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत. त्यामुळे या सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तिवरे धरण फुटल्यानं परिसरातील सात गावं पाण्याखाली गेली होती. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यानं ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत.
मुसळधार पावसामुळं मंगळवारी रात्री तिवरे धरण भरून वाहू लागलं होतं. काही वेळानं धरणाला भगदाड पडल्याचं लक्षात आल्यानं तलाठ्यांनी धरणाच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. पण तासाभरातच धरण फुटलं आणि परिसरातील गावांमध्ये पाणी शिरलं होतं. बेंड वाडीतील काही ग्रामस्थ वाहून गेले. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत असतानाच, विरोधकांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारी अनास्थेचे हे बळी आहेत. त्यामुळं या सरकारवरच हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली आहे.
'जलसंपदा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा'
सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. त्यामुळं आमदार आणि कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तसंच नैतिक जबाबदारी स्वीकारून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, असंही ते म्हणाले.
रत्नागिरीतील तिवरे धरण दुर्घटनेतील मृत्यू हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत. त्यामुळे या सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तिवरे धरण फुटल्यानं परिसरातील सात गावं पाण्याखाली गेली होती. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यानं ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत.
मुसळधार पावसामुळं मंगळवारी रात्री तिवरे धरण भरून वाहू लागलं होतं. काही वेळानं धरणाला भगदाड पडल्याचं लक्षात आल्यानं तलाठ्यांनी धरणाच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. पण तासाभरातच धरण फुटलं आणि परिसरातील गावांमध्ये पाणी शिरलं होतं. बेंड वाडीतील काही ग्रामस्थ वाहून गेले. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत असतानाच, विरोधकांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारी अनास्थेचे हे बळी आहेत. त्यामुळं या सरकारवरच हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली आहे.
'जलसंपदा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा'
सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. त्यामुळं आमदार आणि कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तसंच नैतिक जबाबदारी स्वीकारून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, असंही ते म्हणाले.