म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील जातीयवादी धर्मांध शक्तीविरोधात सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र आले पाहिजे. यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करायला आम्ही तयार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी स्पष्ट केले.
राज्यातील भाजप आणि शिवसेना युतीचा पराभव करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. त्यामुळे सगळ्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन विधानसभेची निवडणूक लढविण्याची आमची भूमिका आहे, असे थोरात यांनी सांगितले.
भाजपला सत्तेची हाव सुटली आहे. केंद्रात सत्ता आणि इतर राज्यातही भाजपा पक्ष सत्तेवर आहे पण विरोधकांच्या हातातील राज्येही भाजपाला हवी आहेत. बकासुरासारखी सत्तेची हाव भाजपाला लागली, अशी टीका थोरात यांनी केली. आम्ही विभागनिहाय पक्षाच्या बैठका घेत आहोत. काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, प्रत्येक गोष्टीला चढउतार असतात. काँग्रेस मोठ्या ताकदीने पुढे येईल, काँग्रेस पुन्हा भरारी घेईल, असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते. त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी अर्ज करत आहेत, असे ते म्हणाले.
राज्यातील जातीयवादी धर्मांध शक्तीविरोधात सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र आले पाहिजे. यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करायला आम्ही तयार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी स्पष्ट केले.
राज्यातील भाजप आणि शिवसेना युतीचा पराभव करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. त्यामुळे सगळ्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन विधानसभेची निवडणूक लढविण्याची आमची भूमिका आहे, असे थोरात यांनी सांगितले.
भाजपला सत्तेची हाव सुटली आहे. केंद्रात सत्ता आणि इतर राज्यातही भाजपा पक्ष सत्तेवर आहे पण विरोधकांच्या हातातील राज्येही भाजपाला हवी आहेत. बकासुरासारखी सत्तेची हाव भाजपाला लागली, अशी टीका थोरात यांनी केली. आम्ही विभागनिहाय पक्षाच्या बैठका घेत आहोत. काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, प्रत्येक गोष्टीला चढउतार असतात. काँग्रेस मोठ्या ताकदीने पुढे येईल, काँग्रेस पुन्हा भरारी घेईल, असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते. त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी अर्ज करत आहेत, असे ते म्हणाले.