म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
देशभरात मंगळवारी भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेच्या (सीआयएससीई) इयत्ता दहावीचे (आयसीएसई) , तसेच बारावीचे (आयएससी) निकाल जाहीर करण्यात आले. दोन्ही परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास तसेच काटेकोर नियोजन यांमुळेच आपल्याला हे यश प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. प्रयत्नांमधील सातत्य आणि मोबाइलपासून घेतलेली फारकत यामुळे चित्त एकाग्र होण्यास फायदा झाल्याचे या मुलांचे म्हणणे आहे...
वर्षभरापूर्वीच नियोजन...
वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यासाचे योग्य नियोजन केले होते. परीक्षेची तारीख जवळ येत होती, तशी अभ्यासाची वेळदेखील वाढवली. परंतु हा निकाल माझ्यासाठी अनपेक्षित होता. निकालानंतर प्रचंड आनंद होत आहे. भविष्यात कम्पुटर इंजिनिअरिंग करण्याचा मानस आहे. मात्र आतापासून त्याचा ताण न घेता इतर क्षेत्रांमधील नव्या वाटादेखील पडताळून पाहणार आहे.
- अनुष्का अग्निहोत्री (९९.४० टक्के), दहावीत राज्यात आणि देशात दुसरी
कष्टाचे चीज झाले
वर्षभर केलेल्या कष्टांचे चीज झाले आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच दररोज ६-७ तास अभ्यास करण्यावर भर दिला. भविष्यात आयआयटीमध्ये शिक्षण घेऊन गुगलसारख्या नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा आहे. अभ्यासासोबत नृत्याची असलेली आवडदेखील मी जोपासणार आहे.
- फोरम सांजनवाला (९९.४० टक्के), दहावीत राज्यात आणि देशात दुसरी
एकाग्रतेने अभ्यास
देशातून तिसरा आलोय, त्यामुळे छानच वाटतेय. माझ्यासह प्रत्येकजण आनंदी आहे. खरेतर संध्याकाळी २-३ तास एकाग्रतेने अभ्यास करणे हाच माझा नियम होता. या काळात मोबाइलपासून दूरच होतो, कारण त्यामुळे मन विचलित होण्याची शक्यताच अधिक होती. इंग्रजी आणि गुजराती वगळता कुठल्याही विषयांसाठी क्लास लावला नव्हता. भविष्यात सीए होण्याची इच्छा आहे.
- जुगल पटेल (९९.२० टक्के), दहावीत राज्यात आणि देशात तिसरा
कष्टाचे फळ
निकालाचा आनंद शब्दात मांडण्यापलिकडचा आहे. दररोज २-४ तास अभ्यास, तासभर व्यायाम आणि इतरवेळी सराव असे माझे वेळापत्रक होते. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करायचे आहे. कष्ट केले की त्याचे फळ मिळतेच हे मला माझ्या निकालामुळे पटले आहे.
- वीर भन्साली (९९.२० टक्के), दहावीत राज्यात आणि देशात तिसरा
कल्पनेपलिकडील यश
खरे सांगायचे, तर या यशासोबत मी अजूनही जुळवून घेऊ शकलेली नाही. माझ्या अपेक्षेपलिकडचे हे यश आहे. अर्थात वर्षभर घेतलेल्या मेहनतीवर विश्वास होता. मात्र देशातून द्वितीय क्रमांक पटकावेन असे वाटले नव्हते. त्यामुळे या यशाचा आनंद काही औरच आहे. वर्षभर वाचन आणि लिखाण यावर भर दिला. इंग्रजी आणि मानसशास्त्र हे माझे आवडीचे विषय आहेत त्यामुळे भविष्यात त्यात करिअर करण्याचा विचार आहे.
- मिहिका सामंत (९९.७५ टक्के), बारावीत राज्यात पहिली देशात दुसरी
सुखद धक्का
दहावीच्या परीक्षेत ९७ टक्क्यांची अपेक्षा होती, मात्र राष्ट्रीय स्तरावरील क्रमवारीत आपले नाव दिसणे हा संपुर्ण कुटुंबासाठी आश्चर्याचा धक्का आहे. दहावीच्या वर्षातही दिवसभर अभ्यास केला नाही. वेळेचे नियोजन करून दररोज दोन तास अभ्यास केला. आयआयटीत प्रवेश घेऊन अभियांत्रिकी विषयाचे शिक्षण घेण्याचा मानस आहे.
- यश भन्साळी (९९.४ टक्के), दहावीत देशात आणि राज्यात दुसरा
यश मिळवण्याचा निश्चय
मागील वर्षी दहावीत देशात प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्याची मुलाखत वाचल्यापासून आपणही असेच यश मिळवायचे हा निश्चय केला होता. त्याप्रमाणे अभ्यासात सातत्य ठेवल्याने परीक्षा अवघड वाटली नाही. किबोर्ड वाजवण्याचा छंद कायम ठेवल्याने मुड फ्रेश राहिला. कोणत्याही कोचिंग क्लासची मदत न घेता अभ्यास केला असून भविष्यात डॉक्टर बनण्याचा मानस आहे.
- ओजस देशपांडे (९९.२ टक्के), दहावीत देशात आणि राज्यात तिसरा
सरावाला महत्त्व
वर्गामध्ये शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देत त्याचा घरी सराव केला, तर परीक्षा अवघड वाटत नाही. स्वयंअध्ययन हा मूलमंत्र असून अभ्यासासह गायन, गिटार यांसारखे छंदही वर्षभर जोपासले. यापुढे कम्प्युटर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
- निमिष वाडेकर (९९.५ टक्के), बारावीत देशात तिसरा आणि राज्यात दुसरा
अनपेक्षित निकाल
वाणिज्य शाखेतून यश मिळवताना देशाच्या क्रमवारीतील हे स्थान अनपेक्षित होते. दररोज सातत्याने अभ्यास करण्यावर भर दिला. सीए होण्याचे स्वप्न शालेय वयापासून उराशी बाळगल्याने यापूर्वीच त्याची तयारी सुरू केली आहे. चित्रकला, ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन ही वर्षभर जोपासली असून कोणत्याही क्षेत्रात करिअर केले तरी आवड जोपासणे गरजेचे आहे.
- श्रेया राज (९९.५ टक्के), बारावीत देशात तिसरी आणि राज्यात दुसरी
त्याला निकाल ठाऊकच नाही
परीक्षा संपल्यानंतर आवड जोपासण्यासाठी आदित्य वाकचोरे भोसला मिलिट्री स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी गेला, तेथे कोणत्याही प्रकारचा संपर्क साधता येत नसल्याने, त्याचे हे यश अद्याप त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही. आदित्य आयसीएसई परीक्षेत ९९.२ टक्के गुण मिळवून दहावीत देशात आणि राज्यात तिसरा आला आहे. दहावीच्या वर्षात मोबाइल गेमिंगमध्ये रमणाऱ्या आदित्यचे यश देशपातळीवर नोंदवले जावे, हे त्याच्या पालकांना अनपेक्षित होते. सतत अभ्यासात न रमणाऱ्या आदित्यने मात्र घवघवीत यश मिळवल्याचा प्रचंड अभिमान असल्याची भावना त्याचे वडील प्रवीण वाकचोरे यांनी व्यक्त केली आहे. त्याला हा निकाल सांगण्यासाठी कुटुंब उत्सुक असून त्याला अभियंत्रिकीचे शिक्षण घ्यायचे आहे.
देशभरात मंगळवारी भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेच्या (सीआयएससीई) इयत्ता दहावीचे (आयसीएसई) , तसेच बारावीचे (आयएससी) निकाल जाहीर करण्यात आले. दोन्ही परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास तसेच काटेकोर नियोजन यांमुळेच आपल्याला हे यश प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. प्रयत्नांमधील सातत्य आणि मोबाइलपासून घेतलेली फारकत यामुळे चित्त एकाग्र होण्यास फायदा झाल्याचे या मुलांचे म्हणणे आहे...
वर्षभरापूर्वीच नियोजन...
वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यासाचे योग्य नियोजन केले होते. परीक्षेची तारीख जवळ येत होती, तशी अभ्यासाची वेळदेखील वाढवली. परंतु हा निकाल माझ्यासाठी अनपेक्षित होता. निकालानंतर प्रचंड आनंद होत आहे. भविष्यात कम्पुटर इंजिनिअरिंग करण्याचा मानस आहे. मात्र आतापासून त्याचा ताण न घेता इतर क्षेत्रांमधील नव्या वाटादेखील पडताळून पाहणार आहे.
- अनुष्का अग्निहोत्री (९९.४० टक्के), दहावीत राज्यात आणि देशात दुसरी
कष्टाचे चीज झाले
वर्षभर केलेल्या कष्टांचे चीज झाले आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच दररोज ६-७ तास अभ्यास करण्यावर भर दिला. भविष्यात आयआयटीमध्ये शिक्षण घेऊन गुगलसारख्या नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा आहे. अभ्यासासोबत नृत्याची असलेली आवडदेखील मी जोपासणार आहे.
- फोरम सांजनवाला (९९.४० टक्के), दहावीत राज्यात आणि देशात दुसरी
एकाग्रतेने अभ्यास
देशातून तिसरा आलोय, त्यामुळे छानच वाटतेय. माझ्यासह प्रत्येकजण आनंदी आहे. खरेतर संध्याकाळी २-३ तास एकाग्रतेने अभ्यास करणे हाच माझा नियम होता. या काळात मोबाइलपासून दूरच होतो, कारण त्यामुळे मन विचलित होण्याची शक्यताच अधिक होती. इंग्रजी आणि गुजराती वगळता कुठल्याही विषयांसाठी क्लास लावला नव्हता. भविष्यात सीए होण्याची इच्छा आहे.
- जुगल पटेल (९९.२० टक्के), दहावीत राज्यात आणि देशात तिसरा
कष्टाचे फळ
निकालाचा आनंद शब्दात मांडण्यापलिकडचा आहे. दररोज २-४ तास अभ्यास, तासभर व्यायाम आणि इतरवेळी सराव असे माझे वेळापत्रक होते. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करायचे आहे. कष्ट केले की त्याचे फळ मिळतेच हे मला माझ्या निकालामुळे पटले आहे.
- वीर भन्साली (९९.२० टक्के), दहावीत राज्यात आणि देशात तिसरा
कल्पनेपलिकडील यश
खरे सांगायचे, तर या यशासोबत मी अजूनही जुळवून घेऊ शकलेली नाही. माझ्या अपेक्षेपलिकडचे हे यश आहे. अर्थात वर्षभर घेतलेल्या मेहनतीवर विश्वास होता. मात्र देशातून द्वितीय क्रमांक पटकावेन असे वाटले नव्हते. त्यामुळे या यशाचा आनंद काही औरच आहे. वर्षभर वाचन आणि लिखाण यावर भर दिला. इंग्रजी आणि मानसशास्त्र हे माझे आवडीचे विषय आहेत त्यामुळे भविष्यात त्यात करिअर करण्याचा विचार आहे.
- मिहिका सामंत (९९.७५ टक्के), बारावीत राज्यात पहिली देशात दुसरी
सुखद धक्का
दहावीच्या परीक्षेत ९७ टक्क्यांची अपेक्षा होती, मात्र राष्ट्रीय स्तरावरील क्रमवारीत आपले नाव दिसणे हा संपुर्ण कुटुंबासाठी आश्चर्याचा धक्का आहे. दहावीच्या वर्षातही दिवसभर अभ्यास केला नाही. वेळेचे नियोजन करून दररोज दोन तास अभ्यास केला. आयआयटीत प्रवेश घेऊन अभियांत्रिकी विषयाचे शिक्षण घेण्याचा मानस आहे.
- यश भन्साळी (९९.४ टक्के), दहावीत देशात आणि राज्यात दुसरा
यश मिळवण्याचा निश्चय
मागील वर्षी दहावीत देशात प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्याची मुलाखत वाचल्यापासून आपणही असेच यश मिळवायचे हा निश्चय केला होता. त्याप्रमाणे अभ्यासात सातत्य ठेवल्याने परीक्षा अवघड वाटली नाही. किबोर्ड वाजवण्याचा छंद कायम ठेवल्याने मुड फ्रेश राहिला. कोणत्याही कोचिंग क्लासची मदत न घेता अभ्यास केला असून भविष्यात डॉक्टर बनण्याचा मानस आहे.
- ओजस देशपांडे (९९.२ टक्के), दहावीत देशात आणि राज्यात तिसरा
सरावाला महत्त्व
वर्गामध्ये शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देत त्याचा घरी सराव केला, तर परीक्षा अवघड वाटत नाही. स्वयंअध्ययन हा मूलमंत्र असून अभ्यासासह गायन, गिटार यांसारखे छंदही वर्षभर जोपासले. यापुढे कम्प्युटर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
- निमिष वाडेकर (९९.५ टक्के), बारावीत देशात तिसरा आणि राज्यात दुसरा
अनपेक्षित निकाल
वाणिज्य शाखेतून यश मिळवताना देशाच्या क्रमवारीतील हे स्थान अनपेक्षित होते. दररोज सातत्याने अभ्यास करण्यावर भर दिला. सीए होण्याचे स्वप्न शालेय वयापासून उराशी बाळगल्याने यापूर्वीच त्याची तयारी सुरू केली आहे. चित्रकला, ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन ही वर्षभर जोपासली असून कोणत्याही क्षेत्रात करिअर केले तरी आवड जोपासणे गरजेचे आहे.
- श्रेया राज (९९.५ टक्के), बारावीत देशात तिसरी आणि राज्यात दुसरी
त्याला निकाल ठाऊकच नाही
परीक्षा संपल्यानंतर आवड जोपासण्यासाठी आदित्य वाकचोरे भोसला मिलिट्री स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी गेला, तेथे कोणत्याही प्रकारचा संपर्क साधता येत नसल्याने, त्याचे हे यश अद्याप त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही. आदित्य आयसीएसई परीक्षेत ९९.२ टक्के गुण मिळवून दहावीत देशात आणि राज्यात तिसरा आला आहे. दहावीच्या वर्षात मोबाइल गेमिंगमध्ये रमणाऱ्या आदित्यचे यश देशपातळीवर नोंदवले जावे, हे त्याच्या पालकांना अनपेक्षित होते. सतत अभ्यासात न रमणाऱ्या आदित्यने मात्र घवघवीत यश मिळवल्याचा प्रचंड अभिमान असल्याची भावना त्याचे वडील प्रवीण वाकचोरे यांनी व्यक्त केली आहे. त्याला हा निकाल सांगण्यासाठी कुटुंब उत्सुक असून त्याला अभियंत्रिकीचे शिक्षण घ्यायचे आहे.