मुंबई: रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांना आता नातेवाईकही पाहू शकणार आहेत. रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून त्याद्वारे नातेवाईकांना आपल्या रुग्णांना पाहणं शक्य होणार आहे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच तशी माहिती दिली.
आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना नातेवाईक सीसीटीव्हीमुळे बघू शकतात, यासाठी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच राज्यात कम्युनिटी स्प्रेड नाही. पॉझिटिव्ह रुग्ण घरी संस्थात्मक विलगीकरणात आहेत. त्यामुळे राज्यात कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपी केंद्र
राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सध्या १० पैकी नऊ रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्रही सुरू करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
dharavi corona cases : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी ७० टक्के करोनामुक्त;
तरुणाच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकले; अकोल्यात खळबळ
दरम्यान, काल राज्यात पुन्हा रग्ण संख्येनं उच्चांक गाठला. काल दिवसभरात ५ हजार ५३६ नवीन रुग्ण आढळल्यांनी नोंद झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या आता २ लाखांच्या उंबरठ्यावर असून आतापर्यंत १ लाख ८० हजार २९८ रुग्ण सापडले आहेत. ज्यात काल १९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, यापैकी ६९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर उर्वरित १२९ मृत्यू मागील कालावधीत असून राज्यातील मृत्यूदर ४.४७ टक्के आहे. आज २२४३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ९३,१५४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५१.६७ % एवढे झाले आहे. मुंबईत आज ६९ रुग्णांचे मृत्यू झाले असून, मीरा- भाईंदर-२६, ठाणे मनपा-१७, कल्याण-डोंबिवली- ४, जळगाव-३, पुणे-३, नवी मुंबई-१, उल्हासनगर-१, भिवंडी- १, पालघर- १. वसई विरार-१, धुळे-१ आणि अकोला शहरात १ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे राज्यातील एकूण करोनाबळींची संख्या ८,०५३ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
यंदा गणपती बसणार नाहीच; 'लालबागचा राजा'चं मंडळ ठाम
आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना नातेवाईक सीसीटीव्हीमुळे बघू शकतात, यासाठी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच राज्यात कम्युनिटी स्प्रेड नाही. पॉझिटिव्ह रुग्ण घरी संस्थात्मक विलगीकरणात आहेत. त्यामुळे राज्यात कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपी केंद्र
राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सध्या १० पैकी नऊ रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्रही सुरू करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
dharavi corona cases : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी ७० टक्के करोनामुक्त;
तरुणाच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकले; अकोल्यात खळबळ
दरम्यान, काल राज्यात पुन्हा रग्ण संख्येनं उच्चांक गाठला. काल दिवसभरात ५ हजार ५३६ नवीन रुग्ण आढळल्यांनी नोंद झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या आता २ लाखांच्या उंबरठ्यावर असून आतापर्यंत १ लाख ८० हजार २९८ रुग्ण सापडले आहेत. ज्यात काल १९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, यापैकी ६९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर उर्वरित १२९ मृत्यू मागील कालावधीत असून राज्यातील मृत्यूदर ४.४७ टक्के आहे. आज २२४३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ९३,१५४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५१.६७ % एवढे झाले आहे. मुंबईत आज ६९ रुग्णांचे मृत्यू झाले असून, मीरा- भाईंदर-२६, ठाणे मनपा-१७, कल्याण-डोंबिवली- ४, जळगाव-३, पुणे-३, नवी मुंबई-१, उल्हासनगर-१, भिवंडी- १, पालघर- १. वसई विरार-१, धुळे-१ आणि अकोला शहरात १ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे राज्यातील एकूण करोनाबळींची संख्या ८,०५३ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
यंदा गणपती बसणार नाहीच; 'लालबागचा राजा'चं मंडळ ठाम