म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या नऊ इमारतींमधील सुमारे २१८ रहिवाशांनी म्हाडाच्या ट्रान्झटि कॅम्पमध्ये जाण्यास नकार दिला आहे. तिथे गेल्यावर पुन्हा मूळ घरात येण्याची शाश्वती नाही. त्यामुळे ट्रान्झटि कॅम्प नको, अशी भूमिका या रहिवाशांनी घेतली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण केल्यानंतर मे महिन्यात नऊ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. त्यानंतर या इमारतींमधील रहिवाशांना स्थलांतरित होण्यासाठी मंडळाने नोटीस पाठवून जूनच्या पहिल्या आठवड्यात ट्रान्झटि कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्याची योजना आखली. रहिवाशांनी घरे रिकामी केली नाहीत तर पोलिसाची मदत घेण्यात येतील, असा इशारा म्हाडाने दिला होता; मात्र निम्मा जून संपला तरी रहिवासी स्थलांतरित झालेले नाहीत. याआधीच्या रहिवाशांचा अनुभव पाहिल्यावर सुमारे २१८ रहिवाशांनी ट्रान्झटि कॅम्पमध्ये जाण्यास नकार दिला आहे.
यापूर्वी दक्षिण मुंबईतल्या उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांना चेंबूरपासून बोरिवली, विक्रोळीतील ट्रान्झटि कॅम्पमध्ये स्थलांतरित केले आहे. २० ते ३० वर्षांपासून हे रहिवासी इथेच राहात असून, दक्षिण मुंबईतील मूळ घरात परत आलेले नाहीत. त्यामुळे ट्रान्झटि कॅम्पमध्ये जाण्याची आमची तयारी नाही, असे या नऊ इमारतींमधील रहिवाशांचे म्हणणे आहे.
पाणी, वीजपुरवठा खंडीत करणार
मुंबई मंडळाच्या म्हणण्यानुसार, या रहिवाशांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांनी स्थलांतर केले नाही, तर टप्प्याटप्प्याने इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडीत करण्यात येईल. या रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसाही पाठवल्या आहेत. पण त्यांनी तसे केले नाही तर पोलिस बंदोबस्तात त्यांना स्थलांतरित करण्यात येईल.
दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या नऊ इमारतींमधील सुमारे २१८ रहिवाशांनी म्हाडाच्या ट्रान्झटि कॅम्पमध्ये जाण्यास नकार दिला आहे. तिथे गेल्यावर पुन्हा मूळ घरात येण्याची शाश्वती नाही. त्यामुळे ट्रान्झटि कॅम्प नको, अशी भूमिका या रहिवाशांनी घेतली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण केल्यानंतर मे महिन्यात नऊ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. त्यानंतर या इमारतींमधील रहिवाशांना स्थलांतरित होण्यासाठी मंडळाने नोटीस पाठवून जूनच्या पहिल्या आठवड्यात ट्रान्झटि कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्याची योजना आखली. रहिवाशांनी घरे रिकामी केली नाहीत तर पोलिसाची मदत घेण्यात येतील, असा इशारा म्हाडाने दिला होता; मात्र निम्मा जून संपला तरी रहिवासी स्थलांतरित झालेले नाहीत. याआधीच्या रहिवाशांचा अनुभव पाहिल्यावर सुमारे २१८ रहिवाशांनी ट्रान्झटि कॅम्पमध्ये जाण्यास नकार दिला आहे.
यापूर्वी दक्षिण मुंबईतल्या उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांना चेंबूरपासून बोरिवली, विक्रोळीतील ट्रान्झटि कॅम्पमध्ये स्थलांतरित केले आहे. २० ते ३० वर्षांपासून हे रहिवासी इथेच राहात असून, दक्षिण मुंबईतील मूळ घरात परत आलेले नाहीत. त्यामुळे ट्रान्झटि कॅम्पमध्ये जाण्याची आमची तयारी नाही, असे या नऊ इमारतींमधील रहिवाशांचे म्हणणे आहे.
पाणी, वीजपुरवठा खंडीत करणार
मुंबई मंडळाच्या म्हणण्यानुसार, या रहिवाशांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांनी स्थलांतर केले नाही, तर टप्प्याटप्प्याने इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडीत करण्यात येईल. या रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसाही पाठवल्या आहेत. पण त्यांनी तसे केले नाही तर पोलिस बंदोबस्तात त्यांना स्थलांतरित करण्यात येईल.