म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
सुमारे ७० वर्षे जुन्या, जीर्ण आणि धोकादायक ठरलेल्या चुनाभट्टीतील टाटानगरमधील इमारतीची दुरवस्था झाली आहे. या तीन मजली इमारतीची दुर्दशा ओढवली असून त्यातील १२२ कुटुंबे भीतीच्या छायेत जगत आहेत. इमारतीत सगळ्याच बाजूंचे गॅलरीचे कठडे तुटल्याने रहिवाशांना घराबाहेर पडतानाही सांभाळून जावे लागते. इमारतीची अवस्था भीषण असून रहिवाशांना दररोज भीतीचा सामना करत घराबाहेर येजा करावी लागत आहे.
डोंगरीतील इमारत दुर्घटनेने शहरातील धोकादायक इमारतींतील रहिवाशांपुढे पेच निर्माण झाला आहे. जुन्या, जीर्ण इमारतींत राहणाऱ्या हजारो कुटुंबांचे योग्यरित्या पुनर्वसन होत नसल्याची तक्रार आहे. त्यात टाटानगरसारख्या तीन मजली इमारतींपुढील पेच वेगळाच आहे. गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या इमारतीची अवस्था भीतीदायक झाली आहे. या इमारतीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्या निकालाकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
टाटानगर इमारतीची रचना इंग्रजी 'सी'प्रमाणे आहे. ७० वर्षांच्या कालावधीत इमारत पूर्णत: धोकादायक झाली आहे. अशातच, गेल्या दीड वर्षापासून इमारतीतील घरांच्या बाहेरील कठडे तुटल्याचे रहिवासी सांगतात. या कठड्यांच्या अभावी व्हरांड्यातून येजा करणेही कठीण झाले आहे. ज्येष्ठ नागरिक, मुलेही तिथे एकेक पाऊल जपून टाकतात. आम्हालाही इमारतीच्या अवस्थेविषयी चिंता सतावत असून पावसात तर डोळ्यास डोळा लागत नसल्याचे एका रहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. इतकी वर्षे आम्ही धोकादायक इमारतीत राहत असून त्याची अवस्था कधी बदलेल हे ठाऊक नसल्याची संतप्त प्रतिक्रिया रहिवासी व्यक्त करतात. पावसात छतातून पाण्याची गळती होऊ नये म्हणून काळजी घेतली असली तरी इमारत धोकादायक असल्याची भीती मनातून जात नाही. शहरात कुठे इमारत दुर्घटना झाल्यानंतर आम्हालाही धडकी भरते, पण जायचे कुठे याचे उत्तर आम्हाला मिळाले नसल्याचे एका रहिवाशाने सांगितले.
सुमारे ७० वर्षे जुन्या, जीर्ण आणि धोकादायक ठरलेल्या चुनाभट्टीतील टाटानगरमधील इमारतीची दुरवस्था झाली आहे. या तीन मजली इमारतीची दुर्दशा ओढवली असून त्यातील १२२ कुटुंबे भीतीच्या छायेत जगत आहेत. इमारतीत सगळ्याच बाजूंचे गॅलरीचे कठडे तुटल्याने रहिवाशांना घराबाहेर पडतानाही सांभाळून जावे लागते. इमारतीची अवस्था भीषण असून रहिवाशांना दररोज भीतीचा सामना करत घराबाहेर येजा करावी लागत आहे.
डोंगरीतील इमारत दुर्घटनेने शहरातील धोकादायक इमारतींतील रहिवाशांपुढे पेच निर्माण झाला आहे. जुन्या, जीर्ण इमारतींत राहणाऱ्या हजारो कुटुंबांचे योग्यरित्या पुनर्वसन होत नसल्याची तक्रार आहे. त्यात टाटानगरसारख्या तीन मजली इमारतींपुढील पेच वेगळाच आहे. गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या इमारतीची अवस्था भीतीदायक झाली आहे. या इमारतीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्या निकालाकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
टाटानगर इमारतीची रचना इंग्रजी 'सी'प्रमाणे आहे. ७० वर्षांच्या कालावधीत इमारत पूर्णत: धोकादायक झाली आहे. अशातच, गेल्या दीड वर्षापासून इमारतीतील घरांच्या बाहेरील कठडे तुटल्याचे रहिवासी सांगतात. या कठड्यांच्या अभावी व्हरांड्यातून येजा करणेही कठीण झाले आहे. ज्येष्ठ नागरिक, मुलेही तिथे एकेक पाऊल जपून टाकतात. आम्हालाही इमारतीच्या अवस्थेविषयी चिंता सतावत असून पावसात तर डोळ्यास डोळा लागत नसल्याचे एका रहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. इतकी वर्षे आम्ही धोकादायक इमारतीत राहत असून त्याची अवस्था कधी बदलेल हे ठाऊक नसल्याची संतप्त प्रतिक्रिया रहिवासी व्यक्त करतात. पावसात छतातून पाण्याची गळती होऊ नये म्हणून काळजी घेतली असली तरी इमारत धोकादायक असल्याची भीती मनातून जात नाही. शहरात कुठे इमारत दुर्घटना झाल्यानंतर आम्हालाही धडकी भरते, पण जायचे कुठे याचे उत्तर आम्हाला मिळाले नसल्याचे एका रहिवाशाने सांगितले.