अ‍ॅपशहर

रहिवाशांना मिळणार ४०५ चौ. फुटांची घरे

पीएमजीपी कॉलनीतील इमारतींमधील रहिवाशांची घरे १६० ते १८० चौरस फुटांची आहेत. पुनर्विकासानंतर या रहिवाशांना ३५० ते ४०५ चौरस फुटांची घरे मिळतील. पुढील चार वर्षांत पुनर्विकासाची योजना पूर्ण होईल.

Maharashtra Times 26 Jan 2018, 6:19 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबर्इ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम homes


पीएमजीपी कॉलनीतील इमारतींमधील रहिवाशांची घरे १६० ते १८० चौरस फुटांची आहेत. पुनर्विकासानंतर या रहिवाशांना ३५० ते ४०५ चौरस फुटांची घरे मिळतील. पुढील चार वर्षांत पुनर्विकासाची योजना पूर्ण होईल.

या इमारतींच्या देखभालीसाठी म्हाडाने दरवर्षी २५ कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षांसाठी १२५ कोटी रुपये देण्याचे आदेश २०१३ मध्ये राज्य सरकारने दिले. आता पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. दरम्यानच्या काळात या ६६ इमारतींपैकी उमरखाडीतील ९ इमारतींची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. इतर इमारतींचीही अवस्था चांगली नाही. त्यामुळे विकास नियंत्रण नियमावली ३३(९) अंतर्गत या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव म्हाडातर्फे राज्य सरकारला पाठवण्यात आला. पण या सर्व इमारतींच्या पुनर्विकासाचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याची सूचना राज्य सरकारतर्फे करण्यात आली. यामध्ये पीएमजीपी प्रकल्पांतर्गत बांधलेल्या इमारतींसह काही खासगी इमारतींचाही समावेश आहे. त्यामुळे या सर्व इमारतींचा क्लस्टर योजनेंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज