म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महिलांना स्वच्छ, सुरक्षित व मोफत स्वच्छतागृहांचा अधिकार मिळायला हवा या मागणीसाठी सुरू झालेली ‘राईट टू पी’ चळवळ आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मुंबईत सुरू झालेल्या या मोहिमेचा विस्तार वाढावा, मागील पाच वर्षात झालेल्या प्रक्रियेचा वेध घेता यावा, यादृष्टीने मुंबईसह राज्यपातळीवर काम करणाऱ्या संस्था, कार्यकर्ते, स्त्रीसंघटना तसेच राजकीय पक्षांमधील महिला नेतृत्त्वाला एकत्र आणण्यासाठी ‘राईट टू पी’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरो, युएन वुमेन आणि ‘राईट टू पी’ या संस्थांनी संयुक्तविद्यमाने 1 सप्टेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही परिषद आयोजित केली आहे. या एकदिवसीय परिषदेत राज्यातून जवळपास अडीचशेजण सहभागी होणार असून यावेळी ‘राईट टू पी’ या महत्त्वाच्या विषयाचा वेध सामाजिक अंगाने घेतला जाणार आहे. ‘राईट टू पी’ या मोहिमेची मुंबईत सुरुवात झाल्यानंतर राज्यातीत विविध ठिकाणी ही मोहीम छेडण्यात आली. सामाजिक संस्थासह अनेक अभ्यासक आणि कार्यकर्त्यांनी चळवळीला बळ दिले आहे. देशात वेगवेगळ्या पातळीवर विविध संस्थाही या मोहिमेची निर्मिती प्रक्रिया समजून घेऊन तसाच प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. या सगळ्या समविचारी व्यक्ती आणि संस्थांना एकाच व्यासपीठावर आणून ही मोहीम आणखी पुढे नेण्यासाठी या परिषदेत चर्चा केली जाणार आहे.
स्मार्ट सिटीतील स्वच्छतागृहे
सामाजिक संघटनासह विविध राजकीय पक्षांमधील महिला नेतृत्वानी त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात त्यांच्यासमोर अनेक राजकीय आणि सामाजिक आव्हानेही आहेत. या आव्हानाचा वेध घेताना नव्याने तयार होणाऱ्या स्मार्ट सिटीमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्याप्ती कशी असेल, हा विषयही या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे.
महिलांना स्वच्छ, सुरक्षित व मोफत स्वच्छतागृहांचा अधिकार मिळायला हवा या मागणीसाठी सुरू झालेली ‘राईट टू पी’ चळवळ आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मुंबईत सुरू झालेल्या या मोहिमेचा विस्तार वाढावा, मागील पाच वर्षात झालेल्या प्रक्रियेचा वेध घेता यावा, यादृष्टीने मुंबईसह राज्यपातळीवर काम करणाऱ्या संस्था, कार्यकर्ते, स्त्रीसंघटना तसेच राजकीय पक्षांमधील महिला नेतृत्त्वाला एकत्र आणण्यासाठी ‘राईट टू पी’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरो, युएन वुमेन आणि ‘राईट टू पी’ या संस्थांनी संयुक्तविद्यमाने 1 सप्टेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही परिषद आयोजित केली आहे. या एकदिवसीय परिषदेत राज्यातून जवळपास अडीचशेजण सहभागी होणार असून यावेळी ‘राईट टू पी’ या महत्त्वाच्या विषयाचा वेध सामाजिक अंगाने घेतला जाणार आहे. ‘राईट टू पी’ या मोहिमेची मुंबईत सुरुवात झाल्यानंतर राज्यातीत विविध ठिकाणी ही मोहीम छेडण्यात आली. सामाजिक संस्थासह अनेक अभ्यासक आणि कार्यकर्त्यांनी चळवळीला बळ दिले आहे. देशात वेगवेगळ्या पातळीवर विविध संस्थाही या मोहिमेची निर्मिती प्रक्रिया समजून घेऊन तसाच प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. या सगळ्या समविचारी व्यक्ती आणि संस्थांना एकाच व्यासपीठावर आणून ही मोहीम आणखी पुढे नेण्यासाठी या परिषदेत चर्चा केली जाणार आहे.
स्मार्ट सिटीतील स्वच्छतागृहे
सामाजिक संघटनासह विविध राजकीय पक्षांमधील महिला नेतृत्वानी त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात त्यांच्यासमोर अनेक राजकीय आणि सामाजिक आव्हानेही आहेत. या आव्हानाचा वेध घेताना नव्याने तयार होणाऱ्या स्मार्ट सिटीमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्याप्ती कशी असेल, हा विषयही या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे.