म. टा. प्रतिनिधी, मुंबई
कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाचे प्रयत्न सुरू असतानाच, यंदा राज्यात बारावीच्या परीक्षेत कॉपीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्यावर्षी कॉपीची ५५४ प्रकरणे नोंदविली गेली होती, तर यंदा हे प्रमाण ०.०५ टक्क्यांनी वाढून ७२९ प्रकरणांवर पोहचले आहे. औरंगाबाद विभागात कॉपीच्या सर्वाधिक २७२ प्रकरणांची नोंद झाली आहे.
बारावी बोर्डाच्या निकालाच्या टक्क्यात यंदा घसरण पाहायला मिळाली आहे. बोर्डाचा एकूण निकाल ४.६६ टक्क्यांनी कमी लागला असताना, कॉपीचे प्रमाण मात्र वाढल्याचे समोर आले आहे. राज्यभरातील एकूण प्रकरणांमध्ये ७२६ कॉपी, तोतयेगिरीचे एक आणि इतर दोन प्रकरणांचा समावेश आहे. मुंबईत मात्र कॉपीचे प्रमाण ‘जैसे थे’ असल्याचे दिसून आले आहे. यंदाही मुंबई विभागात एकूण २३ कॉपीची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाचे प्रयत्न सुरू असतानाच, यंदा राज्यात बारावीच्या परीक्षेत कॉपीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्यावर्षी कॉपीची ५५४ प्रकरणे नोंदविली गेली होती, तर यंदा हे प्रमाण ०.०५ टक्क्यांनी वाढून ७२९ प्रकरणांवर पोहचले आहे. औरंगाबाद विभागात कॉपीच्या सर्वाधिक २७२ प्रकरणांची नोंद झाली आहे.
बारावी बोर्डाच्या निकालाच्या टक्क्यात यंदा घसरण पाहायला मिळाली आहे. बोर्डाचा एकूण निकाल ४.६६ टक्क्यांनी कमी लागला असताना, कॉपीचे प्रमाण मात्र वाढल्याचे समोर आले आहे. राज्यभरातील एकूण प्रकरणांमध्ये ७२६ कॉपी, तोतयेगिरीचे एक आणि इतर दोन प्रकरणांचा समावेश आहे. मुंबईत मात्र कॉपीचे प्रमाण ‘जैसे थे’ असल्याचे दिसून आले आहे. यंदाही मुंबई विभागात एकूण २३ कॉपीची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.