म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
प्रचंड वेगाने चालवली जाणारी वाहने, रस्त्यांवर पडलेले खड्डे या कारणांमुळे २०११ ते २०१६ या पाच वर्षांत ७८ हजार ३१७जणांचे प्राण घेतले आहेत. तर २ लाख ४७ हजार ४०२ व्यक्ती गंभीरपणे जखमी झाले आहेत. देशात होणाऱ्या अपघातांमध्ये महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमाकांचे राज्य आहे.
राज्यात होणाऱ्या वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता राज्यसरकारने अपघातग्रस्त व्यक्तींसाठी मोफत वैद्यकीय सेवा द्यावी, अशी मागणी ऑनलाइन याचिकेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. दिल्ली आणि केरळमध्ये अशा प्रकारे अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय सुविधा दिली जाते. त्यामुळे अशा व्यक्तींचे प्राणही तातडीने वाचू शकतात. अपघात झाल्यानंतर पहिले २४ तास महत्त्वाचे असतात. त्याला वैद्यकीय भाषेत गोल्डन अवर असे म्हणतात. या वेळेमध्ये जर वैद्यकीय मदत मिळाली तर जीव वाचण्यास मदत होते. खासगी रुग्णालयांचे डिपॉझिट भरणेही अनेकदा या अपघातग्रस्त व्यक्तींच्या नातलगांना शक्य नसते. पैशांची जुळवाजुळव करायची की रुग्णांचे प्राण वाचवायचे, या प्रश्नांमध्ये रुग्णांचे कुटुंबीय झुंजत राहतात. त्यामुळे खासगी व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या अपघातांमध्ये सापडलेल्या व्यक्तींना वैद्यकीय उपचार मोफत मिळायला हवेत, अशी मागणी जनआरोग्यअभियानाने ऑनलाइन याचिकेच्या माध्यमातून केली आहे.
प्रचंड वेगाने चालवली जाणारी वाहने, रस्त्यांवर पडलेले खड्डे या कारणांमुळे २०११ ते २०१६ या पाच वर्षांत ७८ हजार ३१७जणांचे प्राण घेतले आहेत. तर २ लाख ४७ हजार ४०२ व्यक्ती गंभीरपणे जखमी झाले आहेत. देशात होणाऱ्या अपघातांमध्ये महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमाकांचे राज्य आहे.
राज्यात होणाऱ्या वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता राज्यसरकारने अपघातग्रस्त व्यक्तींसाठी मोफत वैद्यकीय सेवा द्यावी, अशी मागणी ऑनलाइन याचिकेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. दिल्ली आणि केरळमध्ये अशा प्रकारे अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय सुविधा दिली जाते. त्यामुळे अशा व्यक्तींचे प्राणही तातडीने वाचू शकतात. अपघात झाल्यानंतर पहिले २४ तास महत्त्वाचे असतात. त्याला वैद्यकीय भाषेत गोल्डन अवर असे म्हणतात. या वेळेमध्ये जर वैद्यकीय मदत मिळाली तर जीव वाचण्यास मदत होते. खासगी रुग्णालयांचे डिपॉझिट भरणेही अनेकदा या अपघातग्रस्त व्यक्तींच्या नातलगांना शक्य नसते. पैशांची जुळवाजुळव करायची की रुग्णांचे प्राण वाचवायचे, या प्रश्नांमध्ये रुग्णांचे कुटुंबीय झुंजत राहतात. त्यामुळे खासगी व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या अपघातांमध्ये सापडलेल्या व्यक्तींना वैद्यकीय उपचार मोफत मिळायला हवेत, अशी मागणी जनआरोग्यअभियानाने ऑनलाइन याचिकेच्या माध्यमातून केली आहे.