मध्य रेल्वे रखडल्याने प्लॅटफॉर्मवरील गर्दी वाढत जाताच प्रवाशांनी रस्ते मार्गांचा पर्याय निवडला. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग, एलबीएससह अन्य मार्गही वाहनांनी फुलून गेले. बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण, ठाण्यासह अनेक स्थानकांवर लोकल रद्द करण्यात आल्या. मोटरमननी जादा तास कामास नकार दिल्याने लोकल सेवेच्या व्यवस्थापनाचा बोऱ्या वाजला. परतीच्या मार्गावर लोकल येत नसल्याने वेळापत्रक पार कोलमडून गेले. त्याचा फायदा घेत रिक्षा, टॅक्सीचालकांनी जादा भाडे आकारल्याच्याही प्रवाशांच्या तक्रारी आहेत. ओला, उबर सेवांनाही शुक्रवारी मागणी वाढली होती. संध्याकाळच्या वेळेत आंदोलन संपल्यावर वाहतूक पूर्वपदावर येईल, हा भ्रम ठरला. सायंकाळी उशिरा ठाणे, दादर, भायखळा, कुर्ला आदी बहुसंख्य स्थानकांवर लोकलमध्ये शिरण्यासाठी धडपड सुरू होती. त्यामुळे मोठ्याप्रमाणात अफवाही पसरल्या होत्या.
रस्तेही फुल्ल
मध्य रेल्वे रखडल्याने प्लॅटफॉर्मवरील गर्दी वाढत जाताच प्रवाशांनी रस्ते मार्गांचा पर्याय निवडला...
Maharashtra Times 11 Aug 2018, 4:00 am