म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
परीक्षेत अपयश आलं, प्रेमभंग झाला, आर्थिक परिस्थिती खालावली...अशा अनेक कारणांमुळे खचून जाणारे आजुबाजूला नेहमीच आढळतात. पण ती या सर्वांहून वेगळी ठरली. रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावल्याने 'तू आयुष्यात कधीच डॉक्टर होऊ शकणार नाही, असं सांगत तिचे मनोधैर्य कमी करण्याचा प्रयत्न झाला. पण ती डगमगली नाही. 'एमबीबीएस'ची पदवी घेऊन तिने आता पदव्युत्तर 'एमडी' अभ्यासक्रमासाठी केईएममध्ये प्रवेश घेतला आहे.
सन २००९मध्ये रेल्वे अपघातामध्ये दोन्ही पाय गमावलेल्या रोशन शेख हिची ही कथा. रोशनचे वडील भाजीविक्रीचा व्यवसाय करायचे. काही वर्षांपूर्वी दम्याच्या आजारामुळे तोही बंद झाला. तरीही शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी मुलींना शिकवले. रोशनच्या दोन्ही बहिणी उच्चशिक्षित आहेत. मुलींच्या शिक्षणाला समाजातून विरोधही झाला. पण रोशनने त्याची पर्वा केली नाही आणि एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे एमडीच्या प्रवेशाचीही तयारी सुरू केली. 'एमडी'च्या प्रवेशाप्रसंगी अपंगत्वाचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक असल्यामुळे नियम आडवा आला. रोशनने कायदेशीर लढा देण्याची तयारी सुरू केली. पण खासदार किरीट सोमय्या यांच्या मदतीमुळे सरकारपर्यंत तिची हाक पोहोचली व अपंग विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशासाठी असणारी अपंगत्वाच्या प्रमाणाची ही मर्यादा ४० टक्क्यांवर आणण्यात आली.
कोणत्याही परिस्थितीत मला डॉक्टर व्हायचं होतं. त्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची माझी तयारी होती. कृत्रिम पाय लावल्यामुळे चालताना वेदना होतात. पण डॉक्टर होण्याची मनातील जिद्द या वेदनांपेक्षा प्रबळ होती. - रोशन शेख
परीक्षेत अपयश आलं, प्रेमभंग झाला, आर्थिक परिस्थिती खालावली...अशा अनेक कारणांमुळे खचून जाणारे आजुबाजूला नेहमीच आढळतात. पण ती या सर्वांहून वेगळी ठरली. रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावल्याने 'तू आयुष्यात कधीच डॉक्टर होऊ शकणार नाही, असं सांगत तिचे मनोधैर्य कमी करण्याचा प्रयत्न झाला. पण ती डगमगली नाही. 'एमबीबीएस'ची पदवी घेऊन तिने आता पदव्युत्तर 'एमडी' अभ्यासक्रमासाठी केईएममध्ये प्रवेश घेतला आहे.
सन २००९मध्ये रेल्वे अपघातामध्ये दोन्ही पाय गमावलेल्या रोशन शेख हिची ही कथा. रोशनचे वडील भाजीविक्रीचा व्यवसाय करायचे. काही वर्षांपूर्वी दम्याच्या आजारामुळे तोही बंद झाला. तरीही शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी मुलींना शिकवले. रोशनच्या दोन्ही बहिणी उच्चशिक्षित आहेत. मुलींच्या शिक्षणाला समाजातून विरोधही झाला. पण रोशनने त्याची पर्वा केली नाही आणि एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे एमडीच्या प्रवेशाचीही तयारी सुरू केली. 'एमडी'च्या प्रवेशाप्रसंगी अपंगत्वाचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक असल्यामुळे नियम आडवा आला. रोशनने कायदेशीर लढा देण्याची तयारी सुरू केली. पण खासदार किरीट सोमय्या यांच्या मदतीमुळे सरकारपर्यंत तिची हाक पोहोचली व अपंग विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशासाठी असणारी अपंगत्वाच्या प्रमाणाची ही मर्यादा ४० टक्क्यांवर आणण्यात आली.
कोणत्याही परिस्थितीत मला डॉक्टर व्हायचं होतं. त्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची माझी तयारी होती. कृत्रिम पाय लावल्यामुळे चालताना वेदना होतात. पण डॉक्टर होण्याची मनातील जिद्द या वेदनांपेक्षा प्रबळ होती. - रोशन शेख