मुंबई:
'कोणतंही काम असेल तर मला भेटा. अगदी एखाद्या मुलीला प्रपोझ केलं असेल आणि ती नाही म्हणत असेल तरी माझ्याकडं या. मी १०० टक्के मदत करेन. तुमच्यासाठी त्या मुलीला पळवूनही आणेन.''
हे उद्गार आहेत देशभरात 'बेटी बचाव, बेटी पढाव' मोहीम राबवणाऱ्या भाजपचे मुंबईतील आमदार व प्रवक्ते राम कदम यांचे. घाटकोपर या त्यांच्या मतदारसंघात आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी ही वक्तव्य केली आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
दहीहंडीच्या माध्यमातूनच लोकप्रिय झालेले व घाटकोपरमधून विधानसभेवर निवडून येणारे कदम दरवर्षी धुमधडाक्यात दहीहंडी उत्सव साजरा करतात. यंदाही तो साजरा केला गेला. यावेळी उपस्थित तरुण कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी त्यांनी जोरदार भाषण केलं. कार्यकर्त्यांना आश्वस्त करताना अगदी त्यांच्यासाठी मुली पळवून आणण्याचा शब्दही त्यांनी दिला. त्यासाठी जाहीरपणे स्वत:चा मोबाइल क्रमांक देताना ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
या भाषणानंतर विरोधकांनी कदम यांच्याबरोबर भाजपवरही टीकेची झोड उठवली आहे. जीतेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्येच 'कशा राहतील राज्यातील महिला सुरक्षित?' असा सवाल केला आहे.
राजकारण केलं जातंय!
कदम यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. हा व्हिडिओ अर्धवट व्हायरल केला गेल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. 'कुठल्याही चुकीच्या अर्थानं मी ते वक्तव्य केलं नव्हतं. काही राजकीय पक्ष विनाकारण याचं राजकारण करत आहेत. संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर माझ्या बोलण्याचा संदर्भ लागेल,' असं त्यांनी म्हटलं आहे.
'कोणतंही काम असेल तर मला भेटा. अगदी एखाद्या मुलीला प्रपोझ केलं असेल आणि ती नाही म्हणत असेल तरी माझ्याकडं या. मी १०० टक्के मदत करेन. तुमच्यासाठी त्या मुलीला पळवूनही आणेन.''
हे उद्गार आहेत देशभरात 'बेटी बचाव, बेटी पढाव' मोहीम राबवणाऱ्या भाजपचे मुंबईतील आमदार व प्रवक्ते राम कदम यांचे. घाटकोपर या त्यांच्या मतदारसंघात आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी ही वक्तव्य केली आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
दहीहंडीच्या माध्यमातूनच लोकप्रिय झालेले व घाटकोपरमधून विधानसभेवर निवडून येणारे कदम दरवर्षी धुमधडाक्यात दहीहंडी उत्सव साजरा करतात. यंदाही तो साजरा केला गेला. यावेळी उपस्थित तरुण कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी त्यांनी जोरदार भाषण केलं. कार्यकर्त्यांना आश्वस्त करताना अगदी त्यांच्यासाठी मुली पळवून आणण्याचा शब्दही त्यांनी दिला. त्यासाठी जाहीरपणे स्वत:चा मोबाइल क्रमांक देताना ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
या भाषणानंतर विरोधकांनी कदम यांच्याबरोबर भाजपवरही टीकेची झोड उठवली आहे. जीतेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्येच 'कशा राहतील राज्यातील महिला सुरक्षित?' असा सवाल केला आहे.
राजकारण केलं जातंय!
कदम यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. हा व्हिडिओ अर्धवट व्हायरल केला गेल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. 'कुठल्याही चुकीच्या अर्थानं मी ते वक्तव्य केलं नव्हतं. काही राजकीय पक्ष विनाकारण याचं राजकारण करत आहेत. संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर माझ्या बोलण्याचा संदर्भ लागेल,' असं त्यांनी म्हटलं आहे.