म. टा. प्रतिनिधी, मुंबई
'केवळ मतांच्या राजकारणासाठीच भाजपकडून शबरीमलाचा वाद वाढविण्यात येत आहे', असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला. 'केरळच्या स्थानिक मतांच्या धृवीकरणासाठी भाजपची ही खेळी आहे', असे शिवसेनेचे म्हणणे आहे.
केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यास विरोध करणाऱ्या सनातनी विचारांच्या आंदोलकांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पाठिंबा दिला आहे. 'हिंदूंच्या परंपरा नष्ट करण्याचा हा प्रयत्न असून, भाजप अय्यप्पा भक्तांच्या पाठिशी आहे', असे वक्तव्यही शहा यांनी केले आहे. त्यावर शिवसेनेने वरील स्वरूपाची प्रतिक्रिया दिली आहे. 'शबरीमला मंदिर महिलांना दर्शनासाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी नापसंती व्यक्त केली आहे. न्यायालयाने जनतेच्या भावनांचा आदर राखून निर्णय दिले पाहिजे, असे भाजप नेत्यांना वाटते. केवळ मतांच्या राजकारणासाठीच भाजपने ही भूमिका घेतली आहे', असे कायंदे यांचे म्हणणे आहे.
'महिलांच्या हक्कांविषयी शिवसेना जागरूक आहे. शनी शिंगणापूर मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत शिवसेनेने महिलांच्या हक्काच्या बाजूने भूमिका घेतली होती. हजारो वर्षांच्या काही जुनाट परंपरा बदलायला वेळ लागेल, त्या दृष्टीने ही विचार करायला हवा', असेही कायंदे यावेळी म्हणाल्या.
'केवळ मतांच्या राजकारणासाठीच भाजपकडून शबरीमलाचा वाद वाढविण्यात येत आहे', असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला. 'केरळच्या स्थानिक मतांच्या धृवीकरणासाठी भाजपची ही खेळी आहे', असे शिवसेनेचे म्हणणे आहे.
केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यास विरोध करणाऱ्या सनातनी विचारांच्या आंदोलकांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पाठिंबा दिला आहे. 'हिंदूंच्या परंपरा नष्ट करण्याचा हा प्रयत्न असून, भाजप अय्यप्पा भक्तांच्या पाठिशी आहे', असे वक्तव्यही शहा यांनी केले आहे. त्यावर शिवसेनेने वरील स्वरूपाची प्रतिक्रिया दिली आहे. 'शबरीमला मंदिर महिलांना दर्शनासाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी नापसंती व्यक्त केली आहे. न्यायालयाने जनतेच्या भावनांचा आदर राखून निर्णय दिले पाहिजे, असे भाजप नेत्यांना वाटते. केवळ मतांच्या राजकारणासाठीच भाजपने ही भूमिका घेतली आहे', असे कायंदे यांचे म्हणणे आहे.
'महिलांच्या हक्कांविषयी शिवसेना जागरूक आहे. शनी शिंगणापूर मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत शिवसेनेने महिलांच्या हक्काच्या बाजूने भूमिका घेतली होती. हजारो वर्षांच्या काही जुनाट परंपरा बदलायला वेळ लागेल, त्या दृष्टीने ही विचार करायला हवा', असेही कायंदे यावेळी म्हणाल्या.