म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींच्या भीषण कृत्याबद्दल त्यांना दयामाया न दाखवता कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सीबीआयचे वकील दीपक साळवी यांनी गुरुवारी ‘टाडा’ न्यायालयापुढे केली. अबू सालेम वगळता अन्य चार आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.
अबू सालेम याला पोर्तुगालहून प्रत्यार्पित करण्यात आल्याने प्रत्यार्पण करारानुसार त्याला फाशीची शिक्षा देता येणार नाही. त्यामुळे सालेमला कोणती शिक्षा द्यावी, याविषयी सीबीआय शुक्रवारी युक्तिवाद करणार आहे. सालेमला प्रत्यार्पण कराराचा लाभ मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे फाशीच्या शिक्षेऐवजी त्याला जन्मठेप होणार का, अशी चर्चा आहे. दोषी आरोपींच्या कृत्याबद्दल त्यांना कायद्याने कठोर शिक्षा देता येईल, असा मुद्दा सीबीआयकडून न्या. जी. ए. सानप यांच्यापुढे मांडण्यात आला. त्यासाठी अॅड. साळवी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा हवाला दिला.
अबू सालेमसह मुस्तफा डोसा, करीमुल्ला खान, फिरोज अब्दुल रशीद खान, रियाज सिद्दिकी, ताहीर मर्चंट आणि अब्दुल कयूम यांच्याविरुद्ध खटला चालविण्यात आला. त्यात कयूम याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली. रियाज सिद्दीकी वगळता मुस्तफा डोसा, करीमुल्ला खान, फिरोज खान, ताहीर मर्चंट यांचा कट-कारस्थान व हत्येत सहभाग होता. त्यामुळे त्या चौघांना कठोर शिक्षा देण्याचा आग्रह सीबीआयतर्फे करण्यात आला. रियाज याने अबू सालेम व अन्य सहआरोपींना शस्त्रास्त्रे मुंबईत आणण्यासाठी मदत केली होती. दरम्यान, आज, शुक्रवारी अॅड. साळवी यांचा युक्तिवाद पुढे चालू राहणार आहे.
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींच्या भीषण कृत्याबद्दल त्यांना दयामाया न दाखवता कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सीबीआयचे वकील दीपक साळवी यांनी गुरुवारी ‘टाडा’ न्यायालयापुढे केली. अबू सालेम वगळता अन्य चार आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.
अबू सालेम याला पोर्तुगालहून प्रत्यार्पित करण्यात आल्याने प्रत्यार्पण करारानुसार त्याला फाशीची शिक्षा देता येणार नाही. त्यामुळे सालेमला कोणती शिक्षा द्यावी, याविषयी सीबीआय शुक्रवारी युक्तिवाद करणार आहे. सालेमला प्रत्यार्पण कराराचा लाभ मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे फाशीच्या शिक्षेऐवजी त्याला जन्मठेप होणार का, अशी चर्चा आहे. दोषी आरोपींच्या कृत्याबद्दल त्यांना कायद्याने कठोर शिक्षा देता येईल, असा मुद्दा सीबीआयकडून न्या. जी. ए. सानप यांच्यापुढे मांडण्यात आला. त्यासाठी अॅड. साळवी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा हवाला दिला.
अबू सालेमसह मुस्तफा डोसा, करीमुल्ला खान, फिरोज अब्दुल रशीद खान, रियाज सिद्दिकी, ताहीर मर्चंट आणि अब्दुल कयूम यांच्याविरुद्ध खटला चालविण्यात आला. त्यात कयूम याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली. रियाज सिद्दीकी वगळता मुस्तफा डोसा, करीमुल्ला खान, फिरोज खान, ताहीर मर्चंट यांचा कट-कारस्थान व हत्येत सहभाग होता. त्यामुळे त्या चौघांना कठोर शिक्षा देण्याचा आग्रह सीबीआयतर्फे करण्यात आला. रियाज याने अबू सालेम व अन्य सहआरोपींना शस्त्रास्त्रे मुंबईत आणण्यासाठी मदत केली होती. दरम्यान, आज, शुक्रवारी अॅड. साळवी यांचा युक्तिवाद पुढे चालू राहणार आहे.