मुंबई : मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी व गँगस्टर अबू सालेमने एका महिलेशी निकाह करण्याची परवानगी मागणारा अर्ज टाडा न्यायालयापुढे केला होता. तथापि खटल्याचा निकाल लागला असल्याने तो व्यर्थ असल्याचे सांगत न्यायालयाने तो फेटाळला आहे.
टाडा न्यायालयाचे न्या. जी. ए. सानप यांच्यापुढे सुनावणी झाली. २०१५मध्ये सालेम व एका महिलेचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. सालेम पोलिसांसोबत रेल्वेने लखनौला जात असताना दूरध्वनीवर झालेल्या संभाषणाअंती त्याचा या महिलेशी निकाह झाल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला होता. आपल्याविषयी आलेल्या बातमीने बदनामी झाली असून, सालेमशीच निकाह करण्याचा निर्णय आपण घेतल्याचे या महिलेचे म्हणणे होते. त्यामुळे या महिलेशी निकाह करण्याची परवानगी मागणारा अर्ज सालेमने टाडा न्यायालयापुढे केला होता. शिक्षेचा निकाल लागल्याने आता हा अर्ज निरूपयोगी असल्याचे स्पष्ट करीत न्या. सानप यांनी तो फेटाळून लावला.
टाडा न्यायालयाचे न्या. जी. ए. सानप यांच्यापुढे सुनावणी झाली. २०१५मध्ये सालेम व एका महिलेचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. सालेम पोलिसांसोबत रेल्वेने लखनौला जात असताना दूरध्वनीवर झालेल्या संभाषणाअंती त्याचा या महिलेशी निकाह झाल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला होता. आपल्याविषयी आलेल्या बातमीने बदनामी झाली असून, सालेमशीच निकाह करण्याचा निर्णय आपण घेतल्याचे या महिलेचे म्हणणे होते. त्यामुळे या महिलेशी निकाह करण्याची परवानगी मागणारा अर्ज सालेमने टाडा न्यायालयापुढे केला होता. शिक्षेचा निकाल लागल्याने आता हा अर्ज निरूपयोगी असल्याचे स्पष्ट करीत न्या. सानप यांनी तो फेटाळून लावला.