मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी अखेर या लढाईतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. यावेळी संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला. मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये झालेल्या शेवटच्या बैठकीत राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत शिवसेनेकडून (Shivsena) अंतिम ड्राफ्टही तयार करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर मी कोल्हापूरला जात असताना अचानक सगळे काही बदलले. मी कोल्हापूरला पोहोचेपर्यंत शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली होती, असे संभाजीराजे यांनी म्हटले. (Rajyasabha Election 2022) मात्र, यावेळी संभाजीराजे यांनी माझ्या मनात कोणत्याही राजकीय पक्षाविषयी द्वेष नसल्याचे सांगितले. मला केवळ कोणत्याही बंधनात राहायचे नाही. विशेष म्हणजे यावेळी संभाजीराजे यांनी शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांचा उल्लेख आपुलकीने केला. मी शिवसेना नेत्यांशी अंतिम बोलणी करुन कोल्हापूरला पोहोचलो तेव्हा, संजय पवार या आमच्या कोल्हापूरच्या, माझ्या लाडक्या कार्यकर्त्याला शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याचे मला समजले, असे संभाजीराजे यांनी म्हटले. यानंतर मी शिवसेनेच्या खासदार आणि मंत्र्याला या सगळ्याविषयी विचारले. मात्र, ते काहीही बोलू शकले नाहीत. मी उद्धव ठाकरे यांनाही फोन केला. मात्र, त्यांनी माझा फोन उचललाच नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
'माझ्या निवडणूक अर्जावर सही करणाऱ्या आमदारांच्या पाठिशी आयुष्यभर उभा राहीन'
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरुनही तयार ठेवला होता. मात्र, या निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी मी माघार घेत असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी राज्यसभा निवडणुकीच्या अर्जावर सही करणाऱ्या आमदारांचे आभार मानले. मी आयुष्यभर या आमदारांच्या पाठिशी राहणार आहे. मी या आमदारांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी केव्हाही हाक द्यावी, हा संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेशी असणार आहे. मात्र, संभाजीराजे छत्रपती यांनी या आमदारांची नावे उघड करण्यास नकार दिला.
'माझ्या निवडणूक अर्जावर सही करणाऱ्या आमदारांच्या पाठिशी आयुष्यभर उभा राहीन'
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरुनही तयार ठेवला होता. मात्र, या निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी मी माघार घेत असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी राज्यसभा निवडणुकीच्या अर्जावर सही करणाऱ्या आमदारांचे आभार मानले. मी आयुष्यभर या आमदारांच्या पाठिशी राहणार आहे. मी या आमदारांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी केव्हाही हाक द्यावी, हा संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेशी असणार आहे. मात्र, संभाजीराजे छत्रपती यांनी या आमदारांची नावे उघड करण्यास नकार दिला.