मुंबई:
नोटाबंदी केल्यानंतर ५० दिवसांत जर काळे धन भारतात आणले नाही तर मला फासावर लटकवा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे नोटाबंदीने होरपळलेले मतदारच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करून भाजपची राजकीय हत्या करेल, अशी टीका काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.
नोटाबंदीला २ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेसने आज संपूर्ण देशामध्ये धरणे आंदोलन केले आहे. मुंबईतही काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी निरुपम यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशामध्ये नोटाबंदी जाहीर केली. १५,४१,००० करोड रुपयांच्या नोटा बाद ठरविण्यात आल्या आणि देशातील १३४ करोड जनतेच्या जीवाशी खेळ केला. नोटाबंदीमुळे १५० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, असे निरुपम म्हणाले.
नोटाबंदी करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मला फक्त ५० दिवस द्या, जर नोटाबंदी ५० दिवसांत यशस्वी झाली नाही. तर मला देशातील कोणत्याही चौकात उभे करून फासावर लटकवा. आज नोटाबंदीला २ वर्षे पूर्ण झालेली आहेत. पण आजपर्यंत नोटाबंदीमुळे देशाला काय फायदा झाला? हे नरेंद्र मोदी सांगू शकले नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप सरकारला पाडून जनताच भाजपची राजकीय हत्या घडवून आणेल, अशी टीका निरुपम यांनी केली.
या धरणे आंदोलनामध्ये निरुपम यांच्या सोबत माजी मंत्री सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार चरणसिंग सप्रा, मधू चव्हाण, अशोक भाऊ जाधव, वीरेंद्र बक्षी, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा अजंता यादव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ता राजू वाघमारे, यशोभूमीचे संपादक आनंद राजवर्धन यांच्यासह मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.
नोटाबंदी केल्यानंतर ५० दिवसांत जर काळे धन भारतात आणले नाही तर मला फासावर लटकवा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे नोटाबंदीने होरपळलेले मतदारच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करून भाजपची राजकीय हत्या करेल, अशी टीका काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.
नोटाबंदीला २ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेसने आज संपूर्ण देशामध्ये धरणे आंदोलन केले आहे. मुंबईतही काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी निरुपम यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशामध्ये नोटाबंदी जाहीर केली. १५,४१,००० करोड रुपयांच्या नोटा बाद ठरविण्यात आल्या आणि देशातील १३४ करोड जनतेच्या जीवाशी खेळ केला. नोटाबंदीमुळे १५० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, असे निरुपम म्हणाले.
नोटाबंदी करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मला फक्त ५० दिवस द्या, जर नोटाबंदी ५० दिवसांत यशस्वी झाली नाही. तर मला देशातील कोणत्याही चौकात उभे करून फासावर लटकवा. आज नोटाबंदीला २ वर्षे पूर्ण झालेली आहेत. पण आजपर्यंत नोटाबंदीमुळे देशाला काय फायदा झाला? हे नरेंद्र मोदी सांगू शकले नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप सरकारला पाडून जनताच भाजपची राजकीय हत्या घडवून आणेल, अशी टीका निरुपम यांनी केली.
या धरणे आंदोलनामध्ये निरुपम यांच्या सोबत माजी मंत्री सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार चरणसिंग सप्रा, मधू चव्हाण, अशोक भाऊ जाधव, वीरेंद्र बक्षी, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा अजंता यादव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ता राजू वाघमारे, यशोभूमीचे संपादक आनंद राजवर्धन यांच्यासह मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.