म.टा.विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना बदलण्याचे संकेत काँग्रेसच्या गोटातून दिले जात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणे अवघड असल्याची ज्येष्ठ नेत्यांचे मत विचारात घेऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लवकरच निर्णय घेतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी अनेक अंगलट येणारे प्रयोग केले असले तरी पक्षसंघटनेत ज्यांना महत्त्व दिले अशा मोहन प्रकाश, मधुसूदन मिस्त्री, सी. पी. जोशी, जयराम रमेश, अरुण यादव, व्ही. एम. सुधीरन यांसारख्या अनेक नेत्यांना त्यांनी बाजूलाही सारले आहे. तसाच निर्णय निरुपम यांच्याही बाबतीत राहुल गांधींना घ्यावा लागेल, असे काँग्रेस कार्यकारिणीतील सदस्यांचे मत आहे. निरुपम यांच्याखातर मुंबईवरील उरलीसुरली पकड गमावणे काँग्रेसला परवडणार नाही. त्यामुळे त्यांना लवकरच निर्णय घ्यावा लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
उत्तर प्रदेशपाठोपाठ लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अन्य समविचारी छोट्या पक्षांशी हातमिळवणी करून आघाडी उभारण्याचे ठरवले आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळू शकते. पण लोकसभेच्या सहा जागा असलेल्या मुंबईविषयी तशी खात्री देता येत नाही, असे निवडणुकांचा पुरता अनुभव असलेल्या राज्यातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे. मुंबई आणि कोकणात काँग्रेस कमजोर आहे आणि तिथे पक्षश्रेष्ठींनी तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत या नेत्याने व्यक्त केले. मुंबईत निरुपम अतिशय सक्रिय असले तरी त्यांच्यामुळे अनेक ज्येष्ठ नेते पक्षापासून दुरावले असून त्यांची नाराजी काँग्रेसला परवडणार नाही. मुंबईत प्रतिस्पर्धी भाजप, शिवसेना, मनसे आदी पक्षांचे मराठी नेते आक्रमक होत असताना निरुपम यांच्याकडे नेतृत्व कायम ठेवून काँग्रेसला निवडणुकीत यश मिळवण्याची आशा बाळगता येणार नाही, असेही काँग्रेसच्या अनेक नेत्यांना वाटते.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना बदलण्याचे संकेत काँग्रेसच्या गोटातून दिले जात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणे अवघड असल्याची ज्येष्ठ नेत्यांचे मत विचारात घेऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लवकरच निर्णय घेतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी अनेक अंगलट येणारे प्रयोग केले असले तरी पक्षसंघटनेत ज्यांना महत्त्व दिले अशा मोहन प्रकाश, मधुसूदन मिस्त्री, सी. पी. जोशी, जयराम रमेश, अरुण यादव, व्ही. एम. सुधीरन यांसारख्या अनेक नेत्यांना त्यांनी बाजूलाही सारले आहे. तसाच निर्णय निरुपम यांच्याही बाबतीत राहुल गांधींना घ्यावा लागेल, असे काँग्रेस कार्यकारिणीतील सदस्यांचे मत आहे. निरुपम यांच्याखातर मुंबईवरील उरलीसुरली पकड गमावणे काँग्रेसला परवडणार नाही. त्यामुळे त्यांना लवकरच निर्णय घ्यावा लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
उत्तर प्रदेशपाठोपाठ लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अन्य समविचारी छोट्या पक्षांशी हातमिळवणी करून आघाडी उभारण्याचे ठरवले आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळू शकते. पण लोकसभेच्या सहा जागा असलेल्या मुंबईविषयी तशी खात्री देता येत नाही, असे निवडणुकांचा पुरता अनुभव असलेल्या राज्यातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे. मुंबई आणि कोकणात काँग्रेस कमजोर आहे आणि तिथे पक्षश्रेष्ठींनी तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत या नेत्याने व्यक्त केले. मुंबईत निरुपम अतिशय सक्रिय असले तरी त्यांच्यामुळे अनेक ज्येष्ठ नेते पक्षापासून दुरावले असून त्यांची नाराजी काँग्रेसला परवडणार नाही. मुंबईत प्रतिस्पर्धी भाजप, शिवसेना, मनसे आदी पक्षांचे मराठी नेते आक्रमक होत असताना निरुपम यांच्याकडे नेतृत्व कायम ठेवून काँग्रेसला निवडणुकीत यश मिळवण्याची आशा बाळगता येणार नाही, असेही काँग्रेसच्या अनेक नेत्यांना वाटते.