अ‍ॅपशहर

चित्राताई, सोमय्या मनावर घेऊ नका, सत्तार शिक्षणमंत्री आणि राठोड महिला व बालकल्याण मंत्री झालेले बघायचेत, विस्तारावर टीकेची झोड

राज्य सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. यासोबत सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी सरकार टीका केली आहे. महिलेला मंत्रिमंडळात स्थान दिल्याने राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे. तर संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2022, 6:10 pm
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारावरून आता विरोधी पक्षांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोरदार टीका आहे. याचं कारण आहे, संजय राठोड यांचा पुन्हा मंत्रिमंडळात झालेला समावेश आहे. याशिवाय मंत्रिमंडळात एकही महिला नसल्यानेही टीका केली जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kirit somaiya And Chitra Wagh
किरीट सोमय्या आणि चित्रा वाघ


पुण्यात पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये असताना संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपने संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली होती. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले होते. आता शिवसेनेतून बंड केलेले आणि शिंदे गटात असलेले आमदार संजय राठोड हे मंत्री झाले आहेत. शिंदे-फडणवीस सकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची आज शपथ घेतली. यावरून आता टीका होत आहे.

शिंदे-फडणवीसांना १२ कोटी लोकसंख्येतून एकही महिला मिळाली नाही?, मंत्रिमंडळ विस्तारात मोठा अन्याय

आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी बोचरी टीका केली आहे. संजय राठोड हे युती सरकारमध्ये मंत्री झाल्याने चित्रा वाघ यांनी पक्षाचा राजीनामा देऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. विश्वंभर चौधरी यांनी ट्विट केले आहे. "संजय राठोड मंत्री होत आहेत! पण चित्राताईंनी मनावर घेऊन पक्षाचा राजीनामा वगैरे देऊ नये! उलट राठोडांना महिला बालकल्याण खात्याचं मंत्री करावं"

टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार आले म्हणून किरीटभाईंनीही पक्ष सोडू नये! राजकारणात हे चालणारच. दोघांनी दोघांच्या विरूद्ध लढाई मात्र तत्वतः चालूच ठेवावी! पूजा चव्हाणचा स्मृतीदिन भाजपानं आणि सेनेच्या गद्दारांनी दरवर्षी साजरा करावा. तीच तिला खरी श्रद्धांजली!', चौधरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

विखेंना महसूल, महाजनांना जलसंपदा? नव्या सरकारचं संभाव्य खातेवाटप समोर

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि संजय राठोड यांच्यावरून हल्लाबोल केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात एकही महिला मंत्री नाही, हा महाराष्ट्रातील समस्त महिलांचा अपमान आहे. ज्या संजय राठोड यांचा राजीनामा भारतीय जनता पार्टीने घेतला त्यांनाच आज पहिल्या रांगेत बसवून मंत्रिमंडळात सामावून घेतले, असं म्हणत भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी टीका केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज