अ‍ॅपशहर

न्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी का? हाथरस प्रकरणावर संजय राऊतांचा संताप

हाथरसमध्ये तरुणीसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर देशात सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Sep 2020, 3:22 pm
मुंबईः उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. एका गरीब मुलीला न्याय मिळू नये का? का न्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी का? असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay raut


'जिथं राम मंदिराची उभारणी होत आहे तिथे हाथरससारख्या जिल्ह्यात मुलीवर बलात्कर होतो, हत्या होते, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. एरवी कोणाच्या घराची कौलं जरी उडवली, एखाद्या नटीवर अन्याय, अत्याचार झाला म्हणून ओरडणारे आता कुठेत? तो मीडिया कुठे? एका गरीब मुलीला न्याय मिळू नये का? न्याय मागण्यासाठी एखादी नटी, अभिनेत्रीच हवी आहे का?' असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाचं शिवसेनेकडून स्वागतः राऊत

'रामदास आठवले जे नटीच्या घरी जाऊन सुरक्षा देत होते, नटीच्या स्वागतासाठी विमानतळावर कार्यकर्ते होते ते गेले कुठे? काल राजभवनात गेले होते. हाथरसमधील मुलगी आपली कोणी लागत नाही का? तीसुद्धा आपलीच आहे. तिच्यासाठी ट्विटर व सोशल मीडियावर मोठं आंदोलन छेडण्यात आलेलं ते दिसत नाही. एकेकाळी खंबीरपणे लढणारी दलित चळवळ निस्तेज होताना दिसतोय. एका दलित मुलीवर अत्याचार होतो, बलात्कार होतो आणि कोणीही उसळून उठत नाही,' अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

'स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार?'

'दिल्लीत जेव्हा निर्भया प्रकरण झालं तेव्हा आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो होतो. मीडियाची त्यात महत्त्वाची भूमिका होती. संसद १५ दिवस आम्ही सुरू करु दिली नाही. आज या नव्या राजवटीत मला हाथरस प्रकरणी निराशा दिसतेय कारण ती मुलगी गरीब आहे,' असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज