अ‍ॅपशहर

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक? संजय राऊत यांनी दिलं 'हे' उत्तर

खासदार संजय राऊत व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या थेट वक्तव्यामुळं पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2020, 1:35 pm
मुंबईः 'करोनाच्या संकटकाळात कोणालाही निवडणूका नको आहे. त्यावर अन्य पर्यायही समोर येऊ शकतो. राज्यात मध्यावधी निवडणूका होऊ शकतात,' अशी शक्यता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर संजय राऊत यांनी मात्र मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. 'मध्यावधी निवडणूका घ्यायच्याच असतील तर राजभवनात जाऊन सांगावे लागेल,' असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay raut


संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना पुन्हा भाजपसोबत युती करणार का? अशा अनेक चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी ही भेट राजकीय नव्हती. सामनाच्या मुलाखतीसाठी चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो होतो, असं स्पष्टीकरण दिलं असलं तरी, या भेटीची चर्चा काही थांबण्यास तयार नाही. तसंत, चंद्रकांत पाटील यांनी निवडणूकांबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळं चर्चा अधिक रंगली होती. संजय राऊत यांनी मात्र, पुन्हा एकदा फडणवीसांसोबत झालेल्या चर्चेबद्दल खुलासा केला आहे.

'दोन राजकीय नेते चहा-बिस्किटावर तर नक्कीच बोलणार नाहीत'

'राजकीय चर्चा करणं गुन्हा आहे का? जर दोन राजकीय नेते भेटत असतील दर देशाबद्दल, कृषी विधेयक, जम्मू-काश्मीर, चीन, पाकिस्तान, करोनाबद्दलच चर्चा होते,' असं म्हणत संजय राऊत यांनी चर्चांना पुर्णविराम दिला आहे.


वनवासी क्षेत्रातील नागरिकांना दिलासा; राज्यपालांकडून वनधिकार अधिनियमात बदल

दरम्यान, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना 'राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात अशी परिस्थिती आहे, मध्यावधी निवडणूका कोणालाच नको आहेत. मध्यावधी निवडणूका होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील पण शेवटी कोणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही,' असं वक्तव्य केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज