मुंबई
'डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा आहे, माणूस माकडापासून उत्क्रांत झाल्याचा उल्लेख विज्ञान आणि इतिहासाच्या पुस्तकांतून काढून टाकायला हवा', असं वादग्रस्त विधान करणारे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह हे गोत्यात येण्याची शक्यता आहे. उत्क्रांतीच्या सिद्धांतप्रकरणी सत्यपाल यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं, यासाठी वैज्ञानिकांनी त्यांच्याविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू केलीय.
औरंगाबादमधील अखिल भारतीय वैदिक संमेलनात बोलताना सत्यपाल सिंह यांनी डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा असल्याचे म्हटले होते. आपल्या पूर्वजांपैकी कोणीही जंगलात वानरांपासून मानवाची उत्क्रांती झाल्याचे पाहिले नाही किंवा त्यासंबंधी लिहून ठेवले नाही. लहानपणी वाचलेल्या पुस्तकात, बालकथेत किंवा आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीतही याचा उल्लेख नाही, असे सत्यपाल सिंह म्हणाले. जेव्हापासून माणूस भूतलावर आला आहे, तेव्हापासून तो माणूसच होता आणि माणूसच राहिल. परदेशातील भारतीय वैज्ञानिकांनी ३५ वर्षांपूर्वीच डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा असल्याचे सांगितले आहे, असाही दावा सिंह यांनी केला.
सत्यपाल सिंह यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत वैज्ञानिकांनी शनिवारपासून ऑनलाइन मोहीम सुरू केली. या मोहिमेत सत्यपाल सिंह यांना खुले पत्र लिहिण्यात आले असून समर्थनासाठी संशोधक, वैज्ञानिकांना सहभागी व्हावे असे आवाहन वैज्ञानिकांनी केले आहे.
'डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा आहे, माणूस माकडापासून उत्क्रांत झाल्याचा उल्लेख विज्ञान आणि इतिहासाच्या पुस्तकांतून काढून टाकायला हवा', असं वादग्रस्त विधान करणारे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह हे गोत्यात येण्याची शक्यता आहे. उत्क्रांतीच्या सिद्धांतप्रकरणी सत्यपाल यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं, यासाठी वैज्ञानिकांनी त्यांच्याविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू केलीय.
औरंगाबादमधील अखिल भारतीय वैदिक संमेलनात बोलताना सत्यपाल सिंह यांनी डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा असल्याचे म्हटले होते. आपल्या पूर्वजांपैकी कोणीही जंगलात वानरांपासून मानवाची उत्क्रांती झाल्याचे पाहिले नाही किंवा त्यासंबंधी लिहून ठेवले नाही. लहानपणी वाचलेल्या पुस्तकात, बालकथेत किंवा आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीतही याचा उल्लेख नाही, असे सत्यपाल सिंह म्हणाले. जेव्हापासून माणूस भूतलावर आला आहे, तेव्हापासून तो माणूसच होता आणि माणूसच राहिल. परदेशातील भारतीय वैज्ञानिकांनी ३५ वर्षांपूर्वीच डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा असल्याचे सांगितले आहे, असाही दावा सिंह यांनी केला.
सत्यपाल सिंह यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत वैज्ञानिकांनी शनिवारपासून ऑनलाइन मोहीम सुरू केली. या मोहिमेत सत्यपाल सिंह यांना खुले पत्र लिहिण्यात आले असून समर्थनासाठी संशोधक, वैज्ञानिकांना सहभागी व्हावे असे आवाहन वैज्ञानिकांनी केले आहे.