देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सरकारी कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, खासगी सोसायट्यांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं अनेकांना भाषणं ठोकली. मात्र एका शाळकरी मुलाचं भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. आपल्याला लोकशाहीचा कसा फायदा होतो याचं वर्णन त्यानं भाषणात केलं आहे. त्याचं भाषण ऐकून उपस्थित असलेले सर्वचजण पोट धरून हसू लागले. चिमुकल्याचं भाषण अवघ्या सव्वा मिनिटाचं आहे. पुन्हा पुन्हा पाहावं आणि मनमुराद हसावं अशा स्वरुपाचं भाषण चिमुकल्यानं केलं आहे.
काय म्हणाला चिमुकला?
'खरं तर आज लोकशाही दिन आहे. या दिवसापासून देशात लोकशाही सुरु झाली. मला लोकशाही खूप आवडते. या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करू शकता. भांडू शकता, दोस्ती करू शकता, प्रेमाने राहू शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा करायला, खोड्या करायला, रानात फिरायला, माकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते. असं केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत. कारण ते लोकशाही मानतात. पण माझ्या गावातले बारकाले पोरं माझं नाव सरांना सांगतात. लोकशाहीची मूल्ये आतंकवादी जसे पायदळी तुडवतात तसं सर मला कधी कधी पायदळी तुडवतात. कधी कधी कोंबडा बनवतात आणि म्हणतात तुझं वागणं लोकशाहीला धरुन नाही. तुझ्या तक्रारी फार येतात. पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब पोरगा तालुक्यात शोधून सापडणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो. जय लोकशाही,' असं चिमुकल्यानं त्याच्या भाषणात म्हटलं आहे.
काय म्हणाला चिमुकला?
'खरं तर आज लोकशाही दिन आहे. या दिवसापासून देशात लोकशाही सुरु झाली. मला लोकशाही खूप आवडते. या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करू शकता. भांडू शकता, दोस्ती करू शकता, प्रेमाने राहू शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा करायला, खोड्या करायला, रानात फिरायला, माकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते. असं केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत. कारण ते लोकशाही मानतात. पण माझ्या गावातले बारकाले पोरं माझं नाव सरांना सांगतात. लोकशाहीची मूल्ये आतंकवादी जसे पायदळी तुडवतात तसं सर मला कधी कधी पायदळी तुडवतात. कधी कधी कोंबडा बनवतात आणि म्हणतात तुझं वागणं लोकशाहीला धरुन नाही. तुझ्या तक्रारी फार येतात. पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब पोरगा तालुक्यात शोधून सापडणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो. जय लोकशाही,' असं चिमुकल्यानं त्याच्या भाषणात म्हटलं आहे.