म. टा. वृत्तसेवा, पालघर
पालघर जिल्हा सिलमबम निवड चाचणी स्पर्धा जव्हार येथील भारती विद्यापीठ संकुल येथे संस्थेचे अध्यक्ष डॉ. निलेश आत्माराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या स्पर्धेत पाच तालुक्यांतील सिलमबम खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धा विविध वयोगट व वजन गटात व प्रकारात पार पडल्या. जव्हार येथील ज्ञानगंगा शाळेतील आर्यन निमसे, देवयानी सावकारे, समृद्धी कासले, प्रियल काकडे, सीमा पवार, वैष्णवी लोखंडे, वेदांत तेजे, सृष्टी तांबे यांनी सुवर्ण, कृपा आवारी, शेजीब शैख, झैद मणियार, ईशांत चौहान, हर्षदा भोये यांनी रौप्य आणि समृद्धी रत्नाकर, वैभव बुरा यांनी कांस्य पदके मिळवली. तसेच भारती विद्यापीठ शाळेचे फैझान काझी, मयूर जाधव, रझा मलिक, स्वराज हमन, यांनी सुवर्ण ईनव पाल, भागेश राजपूत, सान्वी दारोळे, अलि मलिक, सृष्टी करपे, अर्णव पाटील, ईशिका पाल, यांनी रौप्य, आकाश नागरगोजे, सोहम गाडगे यांनी कांस्य पदके पटकावली. डहाणू तालुक्यातील कासा येथील पूज्य आचार्य भिसे विद्यालयातील मंथन गायकवाड, योग धोडी, सक्षम टोपले, मानस गायकवाड, खुशी भोये, तन्वी धोडी यांनी सुवर्ण, दर्शना राजड, पारस वझे, प्रेरणा गेंड, सुदीप भोये, सिद्धेश मुऱ्हे यांनी रौप्य आणि मयुरेश पाटील अंजली सातवी, चिराग नम, रवींद्र गुप्ता यांनी कांस्य पदके मिळवली. या स्पर्धेसाठी अधिकृत राष्ट्रीय पंच व राष्ट्रीय पदकविजेते सिलमबम खेळाडू डॉ. निलेश आत्माराम गायकवाड व जिल्हा स्तरीय पंच निलम गायकवाड, धीरज कांबळे, करण तांबडा, साईनाथ पवार, अक्षय करबट, कपिल लाडे, सौरभ मुळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. या जिल्हास्तरीय सिलमबम स्पर्धेत डहाणू तालुक्याचा प्रथम व जव्हार तालुक्याचा द्वितीय क्रमांक आला.
या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीसवितरण समारंभासाठी भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक अजय फरांदे, भारती विद्यापीठ प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दशरथ जरग, भारती विद्यापीठ माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक भीमराव घार्गे, भारती विद्यापीठ प्रशाला मुख्याध्यापक कैलास तरवारे, भारती विद्यापीठ वसतिगृह अधीक्षक वाघमोडे, जव्हार तालुका गटशिक्षणाधिकारी भरत कासले, भारती विद्यापीठचे क्रीडा शिक्षक वसंत चोपदार आदी व पालकवर्ग उपस्थित होते. सर्व विजेते खेळाडू व मार्गदर्शकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
...
फोटो : पाटील