मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युतीचा बार फुसका निघणार का, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असताना अखेर राज्यातील आगामी २१२ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप एकत्रित निवडणुका लढवणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दोन्ही पक्षांनी एकमताने हा निर्णय घेतला असून ही युती राज्य पातळीवर होत असल्याची माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आजच्या बैठकीत मुंबई अथवा ठाणे महानगरपालिका निवडणुकांसाठी युती होणार का, याबाबत मात्र कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
आगामी नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सेना-भाजपची युती झाल्याची घोषणा करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, की दोन्ही पक्षांचा राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये युती करणाचा निर्णय झाला आहे. आजच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मुळीच संभ्रम राहणार नाही. ही युती व्हावी अशी मतदाराचीच इच्छा आहे. याचा विचार करून आम्ही राज्य पातळीवर युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
युतीसंदर्भात आज दिवसभर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. आम्ही दोन्ही पक्षांनी स्थानिक नेत्यांना युती करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहितीही दानवे यांनी दिली. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये जर काही मतभेद असतील तर ते राज्य पातळीवरच सोडवण्याचे आदेश आम्ही दिले असल्याची भूमिकाही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केली.
आज झालेला नगरपालिका निवडणुकांसाठीच्या युतीचा निर्णय हा राज्यातील २१२ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आहे अशी माहिती देत, अद्याप मुंबई तसेच ठाणे पालिकेच्या निवडणुकीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सूचित केले. ही युती राज्य पातळीवरची असून ती १०० टक्के होत आहे असेही राऊत म्हणाले.
'युती अमक्या जिल्ह्यात झाली, तमक्या जिल्ह्यात मात्र झाली नाही असा संभ्रम किंवा संशय राहिलेला नाही', असे म्हणत, 'या दोन पक्षांमध्ये सर्वत्र युती व्हायला हवी ही शिवसेनाप्रमुखांची भूमिका होती', याची आठवणही खासदार राऊत यांनी या पत्रकार परिषदेत करून दिली.
स्थानिक पातळीवरील वाद राज्य पातळीवर मिटेल- राऊत
राज्यभरात २१२ नगरपालिकांची निवणूक एकत्र लढण्याचा निर्णय राज्य पातळीवर झाला आहे. यामध्ये आता कोणतीही अडचण येणार नाही. आता कोणताही संभ्रम नाही. मात्र स्थानिक पातळीवर जर काही ठिकाणी मतभेद असतील, वाद असेल तर तो राज्य पातळीवर मिटेल, त्यातून सकारात्मक मार्ग निघेल असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिले. या युतीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आनंद झाल्याचेही खासदार राऊत यांनी आवर्जून सांगितले.
आज दिवसभर शिवसेना नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. युतीबाबत बोलणी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. खासदार विनायक राऊत यांनी या बैठकीचा वृत्तांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचेही वृत्त आहे.
या बैठकीत युतीबाबतच्या चर्चेचा रोख सकारात्मक राहिला. जेव्हा जागावाटपाची चर्चा होईल त्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल असाही या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे समजते. नगरपालिका निवडणुकांच्या जागा वाटपाचे अधिकार जिल्हाप्रमुखांना देण्यात येतील असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
शिवसेनेशी युती व्हावी याचे संकेत भाजपने वेळोवेळी दिले होते. भाजपसमोर दंड थोपटून उभे राहिलेल्या शिवसेनेने मात्र स्वतंत्र लढण्याचा विचार बोलून दाखवला होता. मात्र आज दिवसभरात घडलेल्या सकारात्मक घडामोडींनतर नगरपालिकांच्या निवडणुंकासाठी सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र येत सेना-भाजपने निवडणुकीतील एकत्र येण्याच्या दृष्टीने आघाडी घेतली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युतीचा बार फुसका निघणार का, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असताना अखेर राज्यातील आगामी २१२ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप एकत्रित निवडणुका लढवणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दोन्ही पक्षांनी एकमताने हा निर्णय घेतला असून ही युती राज्य पातळीवर होत असल्याची माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आजच्या बैठकीत मुंबई अथवा ठाणे महानगरपालिका निवडणुकांसाठी युती होणार का, याबाबत मात्र कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
आगामी नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सेना-भाजपची युती झाल्याची घोषणा करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, की दोन्ही पक्षांचा राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये युती करणाचा निर्णय झाला आहे. आजच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मुळीच संभ्रम राहणार नाही. ही युती व्हावी अशी मतदाराचीच इच्छा आहे. याचा विचार करून आम्ही राज्य पातळीवर युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
युतीसंदर्भात आज दिवसभर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. आम्ही दोन्ही पक्षांनी स्थानिक नेत्यांना युती करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहितीही दानवे यांनी दिली. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये जर काही मतभेद असतील तर ते राज्य पातळीवरच सोडवण्याचे आदेश आम्ही दिले असल्याची भूमिकाही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केली.
आज झालेला नगरपालिका निवडणुकांसाठीच्या युतीचा निर्णय हा राज्यातील २१२ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आहे अशी माहिती देत, अद्याप मुंबई तसेच ठाणे पालिकेच्या निवडणुकीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सूचित केले. ही युती राज्य पातळीवरची असून ती १०० टक्के होत आहे असेही राऊत म्हणाले.
'युती अमक्या जिल्ह्यात झाली, तमक्या जिल्ह्यात मात्र झाली नाही असा संभ्रम किंवा संशय राहिलेला नाही', असे म्हणत, 'या दोन पक्षांमध्ये सर्वत्र युती व्हायला हवी ही शिवसेनाप्रमुखांची भूमिका होती', याची आठवणही खासदार राऊत यांनी या पत्रकार परिषदेत करून दिली.
स्थानिक पातळीवरील वाद राज्य पातळीवर मिटेल- राऊत
राज्यभरात २१२ नगरपालिकांची निवणूक एकत्र लढण्याचा निर्णय राज्य पातळीवर झाला आहे. यामध्ये आता कोणतीही अडचण येणार नाही. आता कोणताही संभ्रम नाही. मात्र स्थानिक पातळीवर जर काही ठिकाणी मतभेद असतील, वाद असेल तर तो राज्य पातळीवर मिटेल, त्यातून सकारात्मक मार्ग निघेल असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिले. या युतीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आनंद झाल्याचेही खासदार राऊत यांनी आवर्जून सांगितले.
आज दिवसभर शिवसेना नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. युतीबाबत बोलणी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. खासदार विनायक राऊत यांनी या बैठकीचा वृत्तांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचेही वृत्त आहे.
या बैठकीत युतीबाबतच्या चर्चेचा रोख सकारात्मक राहिला. जेव्हा जागावाटपाची चर्चा होईल त्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल असाही या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे समजते. नगरपालिका निवडणुकांच्या जागा वाटपाचे अधिकार जिल्हाप्रमुखांना देण्यात येतील असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
शिवसेनेशी युती व्हावी याचे संकेत भाजपने वेळोवेळी दिले होते. भाजपसमोर दंड थोपटून उभे राहिलेल्या शिवसेनेने मात्र स्वतंत्र लढण्याचा विचार बोलून दाखवला होता. मात्र आज दिवसभरात घडलेल्या सकारात्मक घडामोडींनतर नगरपालिकांच्या निवडणुंकासाठी सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र येत सेना-भाजपने निवडणुकीतील एकत्र येण्याच्या दृष्टीने आघाडी घेतली आहे.