अ‍ॅपशहर

दिब्रिटोंना विरोध मराठी भाषेला भूषणावह नाही: गज्वी

हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, जैन धर्मियांबरोबरच आदिवासी, भटकेही मराठीत लेखन करत असून त्यांचाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर सारखाच अधिकार आहे. हा अधिकार प्राप्त होत असताना लेखकाचं साहित्यिक कतृत्व जोखले जातेच. तरीही कुणी धर्म वेगळा म्हणून साहित्य संमेलनाचे अध्यपद नाकारत असेल तर हे मराठी भाषेला भूषणावह नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Sep 2019, 2:33 pm

साहित्य संमेलन: दिब्रिटोंच्या निवडीला हिंदुत्ववाद्यांचा विरोध

मुंबई: हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, जैन धर्मियांबरोबरच आदिवासी, भटकेही मराठीत लेखन करत असून त्यांचाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर सारखाच अधिकार आहे. हा अधिकार प्राप्त होत असताना लेखकाचं साहित्यिक कतृत्व जोखले जातेच. तरीही कुणी धर्म वेगळा म्हणून साहित्य संमेलनाचे अध्यपद नाकारत असेल तर हे मराठी भाषेला भूषणावह नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड मराठी भाषेचे हित लक्षात घेऊनच केली गेली असून साहित्यबाह्य घटकांनी यात लुडबूड करू नये, असा टोलाही गज्वी यांनी विरोधकांना लगावला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम premanand-gajvi


मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदं आजवर कोणत्या धर्माच्या लोकांनी सर्वाधिक भूषवली?, असा सवाल उपस्थित करतानाच तेव्हा कुणी आकांत केला नाही, मात्र एक फादर अध्यक्ष निवडला जाताच हिंदू मानसिकता विरोधात उभी राहिली असे दिसत आहे, असे म्हणत गज्वी यांनी हिंदुत्ववादी विरोधकांना लक्ष्य केले आहे.


फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला हिंदुत्ववाद्यांनी विरोध केल्याने मराठी साहित्य संमेलन संकटात सापडले आहे, असे दिसू लागल्याचेही गज्वी यांनी म्हटले आहे. गज्वी यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपले विचार मांडले आहेत.

वाचा: करुणा आणि ऋजुतेचा गौरव

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज