म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशा स्थितीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढूनही चांगल्या जागा मिळतील, असा अंदाज शिवसेना आणि भाजपला आल्यामुळे या दोन्ही पक्षांनी युती करण्याऐवजी स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचे खात्रीलायकरित्या कळते.
महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २७ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मात्र, अजूनही युतीच्या जागावाटपाबाबत काहीच तोडगा न निघाल्याने आता एवढ्या कमी काळात युती होणे कठीण असल्याचे सांगितले जाते. २०१४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेनेने १४ तर भाजपने १५ जागा जिंकल्या. याआधी शिवसेनेकडून भाजपला महापालिका निवडणुकीतील जागावाटपावरून दुजाभाव केला जात होता. मात्र भाजपच्या जागा वाढल्याने साहजिकच त्यांनी महापालिकेत जादा जागांवर दावा सांगितला आहे.
शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी खासगी संस्थांकडून सर्वेक्षण केले असून या दोन्ही पक्षांना चांगल्या जागा मिळणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. उलट शिवसेना भाजप यांच्यात युती झाल्यास त्याचा काँग्रेस आणि मनसे यांना काहीसा फायदाच होणार असल्याची निरीक्षणे देखील या सर्वेक्षणांमध्ये नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे जागावाटपाची चर्चा करण्याऐवजी युतीच्या बैठकांमध्ये पारदर्शी कारभार तसेच ६० जागा यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे कळते. युती करण्यापेक्षा स्वतंत्रपणे निवडणुका लढवून आणि नंतर एकत्र यायचे याविषयी देखील दोन्ही पक्षात चर्चा झाल्याचे कळते.
दरम्यान, बुधवारी नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर महापालिकेतील युतीसंदर्भातील परिस्थितीचा मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. युती होईल किंवा न होईल. पण जिंकण्यासाठीच लढा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे कळते.
याबाबत अधिक माहिती देताना शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, ‘आम्ही आमचे म्हणणे उद्धव ठाकरेंसमोर मांडले आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलेले आहे. उद्याच्या कार्यकर्ता मेळाव्यात युतीबाबतची घोषणा स्वतः उद्धव ठाकरे करतील. उद्धव ठाकरे वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले का, याबाबत ‘पारदर्शीपणे’ माहिती समोर येईलच,’ असेही त्यांनी सांगितले.
भाजपला अजूनही आशा. .. .
मुंबईच्या विकासाच्या अजेंड्यावर शिवसेनेसोबत आमची युती व्हावी अशी आमची इच्छा असून आम्ही त्यांच्या निरोपाची वाट पाहत आहोत, असे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी ‘मटा’ला सांगितले.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशा स्थितीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढूनही चांगल्या जागा मिळतील, असा अंदाज शिवसेना आणि भाजपला आल्यामुळे या दोन्ही पक्षांनी युती करण्याऐवजी स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचे खात्रीलायकरित्या कळते.
महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २७ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मात्र, अजूनही युतीच्या जागावाटपाबाबत काहीच तोडगा न निघाल्याने आता एवढ्या कमी काळात युती होणे कठीण असल्याचे सांगितले जाते. २०१४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेनेने १४ तर भाजपने १५ जागा जिंकल्या. याआधी शिवसेनेकडून भाजपला महापालिका निवडणुकीतील जागावाटपावरून दुजाभाव केला जात होता. मात्र भाजपच्या जागा वाढल्याने साहजिकच त्यांनी महापालिकेत जादा जागांवर दावा सांगितला आहे.
शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी खासगी संस्थांकडून सर्वेक्षण केले असून या दोन्ही पक्षांना चांगल्या जागा मिळणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. उलट शिवसेना भाजप यांच्यात युती झाल्यास त्याचा काँग्रेस आणि मनसे यांना काहीसा फायदाच होणार असल्याची निरीक्षणे देखील या सर्वेक्षणांमध्ये नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे जागावाटपाची चर्चा करण्याऐवजी युतीच्या बैठकांमध्ये पारदर्शी कारभार तसेच ६० जागा यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे कळते. युती करण्यापेक्षा स्वतंत्रपणे निवडणुका लढवून आणि नंतर एकत्र यायचे याविषयी देखील दोन्ही पक्षात चर्चा झाल्याचे कळते.
दरम्यान, बुधवारी नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर महापालिकेतील युतीसंदर्भातील परिस्थितीचा मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. युती होईल किंवा न होईल. पण जिंकण्यासाठीच लढा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे कळते.
याबाबत अधिक माहिती देताना शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, ‘आम्ही आमचे म्हणणे उद्धव ठाकरेंसमोर मांडले आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलेले आहे. उद्याच्या कार्यकर्ता मेळाव्यात युतीबाबतची घोषणा स्वतः उद्धव ठाकरे करतील. उद्धव ठाकरे वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले का, याबाबत ‘पारदर्शीपणे’ माहिती समोर येईलच,’ असेही त्यांनी सांगितले.
भाजपला अजूनही आशा. .. .
मुंबईच्या विकासाच्या अजेंड्यावर शिवसेनेसोबत आमची युती व्हावी अशी आमची इच्छा असून आम्ही त्यांच्या निरोपाची वाट पाहत आहोत, असे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी ‘मटा’ला सांगितले.