म. टा. प्रतिनिधी, मुंबई:
'पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट आणि अन्य ठिकाणचे दहशतवाद्यांचे तळ हवाई बॉम्बहल्ल्याने नष्ट करावेत, असा सल्ला मी सरकारला दिल्याचा उल्लेख प्रसारमाध्यमांनी केला. परंतु तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे. मी त्या सर्वपक्षीय बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्षप्रमुखांची संमती होती, असे आपणास म्हणावयाचे होते', असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसे निवेदन पक्षातर्फे पत्रकारांना देण्यात आले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी बालाकोटवरील हवाई हल्ल्याबाबत वक्तव्य केले होते. 'काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक दिल्लीत बोलावली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही सहभाग होता', असे शरद पवार यांनी सांगितले आहे. 'भारतीय सैन्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. १९६५ आणि १९७१च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले याची चर्चा व्हायला नको', असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक कारवाईचे राजकारण होऊ नये, असे मतही त्यांनी स्पष्टीकरणाच्या निवेदनात व्यक्त केले आहे.
'पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट आणि अन्य ठिकाणचे दहशतवाद्यांचे तळ हवाई बॉम्बहल्ल्याने नष्ट करावेत, असा सल्ला मी सरकारला दिल्याचा उल्लेख प्रसारमाध्यमांनी केला. परंतु तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे. मी त्या सर्वपक्षीय बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्षप्रमुखांची संमती होती, असे आपणास म्हणावयाचे होते', असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसे निवेदन पक्षातर्फे पत्रकारांना देण्यात आले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी बालाकोटवरील हवाई हल्ल्याबाबत वक्तव्य केले होते. 'काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक दिल्लीत बोलावली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही सहभाग होता', असे शरद पवार यांनी सांगितले आहे. 'भारतीय सैन्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. १९६५ आणि १९७१च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले याची चर्चा व्हायला नको', असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक कारवाईचे राजकारण होऊ नये, असे मतही त्यांनी स्पष्टीकरणाच्या निवेदनात व्यक्त केले आहे.