मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
'दोन सवर्णांच्या भांडणामध्ये दलित तरुणांचा वापर करून अॅट्रॉसिटीच्या तक्रारी केल्या जातात. या कायद्याचा असा गैरवापर केला जाऊ नये, इतकीच आमची भूमिका आहे. तो कायदा रद्द करावा असं आमचं म्हणणं नाही,' अशी नवी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मांडली.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेनंतर अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. तर, अलीकडेच जालना येथे बोलताना पवार यांनीही गैरवापर होत असेल तर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा असं म्हटलं होतं. या वक्तव्यावरून पवार यांनी आज घुमजाव केलं. 'अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर दलितांकडून नव्हे तर स्थानिक नेतृत्वाकडून केला जातो,' असंही पवार यांनी यावेळी नमूद केलं.
मुस्लिम तरुणांची सरसकट धरपकड नको!
निर्दोष मुस्लिम तरुणांवरील कारवाईबद्दलही पवार यांनी चिंता व्यक्त केली. 'मुस्लिम संघटनांनी इसिसचा निषेध केला आहे. तरीही, मराठवाड्यासह काही ठिकाणी तरुणांची धरपकड करण्यात येते. मुस्लिम तरुणांची अशी सरसकट धरपकड करणं चुकीचं आहे. मुस्लिम तरुणांना अटक केली जात असेल तर २४ तासांत न्यायालयासमोर हजर करायला हवं,' असं पवार यांनी सांगितलं.
मराठ्यांच्या मोर्चांची दखल घ्या!
कोपर्डी प्रकरणानंतर निघणाऱ्या मोर्चांची सरकारनं दखल घ्यायला हवी, असं पवार यावेळी म्हणाले. 'महाराष्ट्रातील अनेक मोर्चांत लाखो लोग सहभागी झालेत. लोक इतक्या मोठ्या प्रमाणात एकवटत असतील, तर त्यांच्या मनात काय आहे हे सरकारनं जाणून घ्यायला हवं. मराठा समाजाला आरक्षण आणि अॅट्रॉसिटीच्या गैरवापराविरुद्धचा रोष या दोन प्रमुख मागण्या या मोर्चेकऱ्यांच्या आहेत. त्या ऐकून घ्यायला हव्यात. अॅट्रॉसिटी रद्द व्हावा असं माझं म्हणणं नाही, असं ते म्हणाले. 'आर्थिकदृष्ट्या गरीब मराठे व मुस्लिमांना आरक्षण मिळायला हवं,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.
'दोन सवर्णांच्या भांडणामध्ये दलित तरुणांचा वापर करून अॅट्रॉसिटीच्या तक्रारी केल्या जातात. या कायद्याचा असा गैरवापर केला जाऊ नये, इतकीच आमची भूमिका आहे. तो कायदा रद्द करावा असं आमचं म्हणणं नाही,' अशी नवी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मांडली.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेनंतर अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. तर, अलीकडेच जालना येथे बोलताना पवार यांनीही गैरवापर होत असेल तर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा असं म्हटलं होतं. या वक्तव्यावरून पवार यांनी आज घुमजाव केलं. 'अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर दलितांकडून नव्हे तर स्थानिक नेतृत्वाकडून केला जातो,' असंही पवार यांनी यावेळी नमूद केलं.
मुस्लिम तरुणांची सरसकट धरपकड नको!
निर्दोष मुस्लिम तरुणांवरील कारवाईबद्दलही पवार यांनी चिंता व्यक्त केली. 'मुस्लिम संघटनांनी इसिसचा निषेध केला आहे. तरीही, मराठवाड्यासह काही ठिकाणी तरुणांची धरपकड करण्यात येते. मुस्लिम तरुणांची अशी सरसकट धरपकड करणं चुकीचं आहे. मुस्लिम तरुणांना अटक केली जात असेल तर २४ तासांत न्यायालयासमोर हजर करायला हवं,' असं पवार यांनी सांगितलं.
मराठ्यांच्या मोर्चांची दखल घ्या!
कोपर्डी प्रकरणानंतर निघणाऱ्या मोर्चांची सरकारनं दखल घ्यायला हवी, असं पवार यावेळी म्हणाले. 'महाराष्ट्रातील अनेक मोर्चांत लाखो लोग सहभागी झालेत. लोक इतक्या मोठ्या प्रमाणात एकवटत असतील, तर त्यांच्या मनात काय आहे हे सरकारनं जाणून घ्यायला हवं. मराठा समाजाला आरक्षण आणि अॅट्रॉसिटीच्या गैरवापराविरुद्धचा रोष या दोन प्रमुख मागण्या या मोर्चेकऱ्यांच्या आहेत. त्या ऐकून घ्यायला हव्यात. अॅट्रॉसिटी रद्द व्हावा असं माझं म्हणणं नाही, असं ते म्हणाले. 'आर्थिकदृष्ट्या गरीब मराठे व मुस्लिमांना आरक्षण मिळायला हवं,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.