अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्यांनी उगाच ईरेला पेटू नयेः शिवसेना

राज्य ग्रामपंचायतीचे असो नाही तर विधानसभा आणि लोकसभेचे, ते बहुमतावरच चालते. नवी मुंबईचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उगाच ईरेला न पेटता बहुमताचा आदर करावा, असं सांगत शिवसेनेनं 'मुंढे हटाव'चा नारा दिला आहे.

Maharashtra Times 27 Oct 2016, 10:37 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv sena asks cm to take action against tukaram mundhe
मुख्यमंत्र्यांनी उगाच ईरेला पेटू नयेः शिवसेना


राज्य ग्रामपंचायतीचे असो नाही तर विधानसभा आणि लोकसभेचे, ते बहुमतावरच चालते. नवी मुंबईचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उगाच ईरेला न पेटता बहुमताचा आदर करावा, असं स्पष्टपणे सांगत शिवसेनेनं 'मुंढे हटाव'चा नारा दिला आहे.

शिवसेनेने आतापर्यंत सर्वच प्रामाणिक आणि धडाडीच्या अधिकार्‍यांना पाठबळ दिल्याची नोंद इतिहासात आहे. तुकाराम मुंढे यांच्या बाबतीत आमची तीच भूमिका आहे, पण लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना कस्पटासमान लेखणे व त्यांना अडचणीत आणण्यासाठीच अधिकाराचा वापर करणे ही मनमानी आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून मुंढे यांचे कान उपटले आहेत. एखाद्या ‘डॉन’ किंवा ‘रॉबिनहुड’प्रमाणे वागून लोकप्रियता मिळविल्यानेच अधिकारी चांगला ठरतो असे नाही, असंही त्यांनी सुनावलंय.

>> आयुक्त हा सरकारचा प्रतिनिधी असतो व त्याने घटना व कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचे असते. लोकप्रतिनिधींच्या कुंडल्या काढून त्यांना अडचणीत आणायचे व स्वत:चा धडाकेबाजपणा सिद्ध करायचा हे योग्य नाही.

>> तुकाराम मुंढे हे धडाडीचे किंवा प्रामाणिक, सचोटीचे असतीलही, पण राज्यात आणि देशात तेच एकमेव सचोटीचे आहेत असे सांगणे हा इतर प्रामाणिक अधिकार्‍यांचा अपमान आहे.

>> मुंढे यांनी नवी मुंबईकरांच्या हिताची अनेक कामे तडाखेबंद पद्धतीने केली असेही सांगितले जात आहे. महापालिका आयुक्त या नात्याने त्यांनी काही कामे केलीही असतील, पण याचा अर्थ लोकशाही मार्गाने निवडून आलेले नगरसेवक जनहिताची कामे धडाडीने करीत नाहीत असे कसे म्हणता येईल?

>> मुंढे यांनी गेल्या पाच महिन्यांत शुभारंभाचे नारळ फोडून १५ रुपयांच्याही कामांचा शुभारंभ झाला नाही.

>> मुंढे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले असल्याचे बोलले जाते, पण मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले आहोत म्हणून कसेही वागण्याचा व मनमानी करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला?

>> स्वत: मुख्यमंत्री विरोधकांशी विनम्रतेने वागतात व तेवढा संयम हा ठेवायलाच हवा. तुकाराम मुंढे यांच्यासमोर मोठी कारकीर्द आहे. त्यांना मोठे काम करायचे आहे, पण संयमाचा बांध तोडून डोक्यात राग घालून काम केले तर त्यांचे कठीण आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज