मुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचं शिवसेनेने जाहीर केलं असलं तरी विधानपरिषद निवडणूक भाजपसोबत युती करून लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकाही एकत्र लढविणार का? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना-भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकांसाठी ५०-५० चा फॉर्म्युला निश्चित केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप प्रत्येकी तीन जगांवर लढणार आहे. या तीन पैकी नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार उभे राहणार आहेत. तर उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून भाजप लढणार आहे. विशेष म्हणजे विदर्भातील दोन्ही जागा शिवसेनेने भाजपला सोडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अमरावतीतून भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे-पाटील यांचा अर्ज दाखल केला आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड मधून सुरेश धस, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून भाजपचे प्रदेश संघटन सचिव रामदास आंबटकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्याची उद्या ३ मे रोजी शेवटची तारीख असून २१ मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, विधानपरिषदेसाठी शिवसेना-भाजप दरम्यान युती झाली असली तरी पालघर आणि गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दोन्ही पक्षात कोणताही निर्णय झालेला नाही. लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला तर २०१९ च्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची पंचाईत होऊ शकते, त्यामुळे या निवडणुकीत तटस्थ राहण्याकडे शिवसेनेचा कल असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
कराड राष्ट्रवादीत, भाजपला धक्का
लातूर ग्रामीणमधील भाजपचे वजनदार नेते, मुंडे परिवाराचे निकटवर्तीय रमेश कराड यांनी भाजपाला रामराम ठोकला असल्याची अधिकृत माहित असून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर ते उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करतील.
शिवसेना-भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकांसाठी ५०-५० चा फॉर्म्युला निश्चित केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप प्रत्येकी तीन जगांवर लढणार आहे. या तीन पैकी नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार उभे राहणार आहेत. तर उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून भाजप लढणार आहे. विशेष म्हणजे विदर्भातील दोन्ही जागा शिवसेनेने भाजपला सोडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अमरावतीतून भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे-पाटील यांचा अर्ज दाखल केला आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड मधून सुरेश धस, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून भाजपचे प्रदेश संघटन सचिव रामदास आंबटकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्याची उद्या ३ मे रोजी शेवटची तारीख असून २१ मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, विधानपरिषदेसाठी शिवसेना-भाजप दरम्यान युती झाली असली तरी पालघर आणि गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दोन्ही पक्षात कोणताही निर्णय झालेला नाही. लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला तर २०१९ च्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची पंचाईत होऊ शकते, त्यामुळे या निवडणुकीत तटस्थ राहण्याकडे शिवसेनेचा कल असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
कराड राष्ट्रवादीत, भाजपला धक्का
लातूर ग्रामीणमधील भाजपचे वजनदार नेते, मुंडे परिवाराचे निकटवर्तीय रमेश कराड यांनी भाजपाला रामराम ठोकला असल्याची अधिकृत माहित असून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर ते उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करतील.