मुंबई: राज्यातील सत्तापेच आणि राष्ट्रपती राजवटीच्या पार्श्वभूमीवर येत्या शुक्रवारी शिवसेना आमदारांची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मार्गदर्शन करणार असून सर्व आमदारांना येताना पाच दिवसाचे कपडे, आधार आणि पॅनकार्ड घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यात सत्तास्थापन करण्याच्या दिशेने हालचाल करत असल्याचे संकेत मिळत असून या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राज्यातील सत्तापेच न सुटल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही काँग्रेससोबत जाण्यासाठी शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामाही दिला आहे. शिवाय एनडीएतूनही शिवसेनाबाहेर पडली आहे. त्यामुळे शिवसेनेला संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी बाकांवर स्थान देण्यात आलं आहे. त्याशिवाय तिन्ही पक्षांनी मिळून किमान समान कार्यक्रमाचा मसुदाही तयार केला आहे. मात्र शिवसेनेसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्यापही थेट भाष्य केलेलं नाही. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून अद्यापही संभ्रम निर्माण झालेला आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात? आमदारांना काय सूचना देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजप हा मोहम्मद घोरीच्या प्रवृत्तीचा: उद्धव ठाकरे
शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचं शिवसेनेचे मुख्यप्रतोद सुनील प्रभू यांनी सांगितलं. यावेळी राज्यातील सत्तापेचाबरोबरच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचाही आढावा घेतला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही आमदारांकडून माहिती घेतली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आमदारांना पुन्हा अज्ञातस्थळी ठेवणार?
शिवसेनेने सर्व आमदारांना येताना आधार आणि पॅनकार्डसह पाच दिवस पुरेल एवढे कपडे घेऊन यायला सांगितले आहे. आमदारांची राज्यपालांसमोर ओळख परेड करण्याची वेळ आली तर आधारकार्ड आणि पॅनकार्डद्वारे ओळख पटवता येऊ शकते, म्हणून या आमदारांना ओळखपत्र घेऊन येण्यास सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं. दिल्लीत सत्तेस्थापनेबाबतच्या वेगवान हालचाली होत आहेत. दोन-चार दिवसात त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा आमदारांना मुंबईत बोलवावे लागण्याची शक्यता असल्याने त्यांना थेट कपडेच घेऊन यायला सांगितले आहे. त्यामुळे या आमदारांना मुंबईतच पुन्हा अज्ञातस्थळी ठेवण्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
आपसात भांडून दोघांचे नुकसान: मोहन भागवत
राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपला सर्वाधिक १०५ जागा जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला ३, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण १३ अपक्षही निवडून आले आहेत.
संजय राऊत म्हणजे कुजका म्हातारा: नीलेश राणे
राज्यातील सत्तापेच न सुटल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही काँग्रेससोबत जाण्यासाठी शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामाही दिला आहे. शिवाय एनडीएतूनही शिवसेनाबाहेर पडली आहे. त्यामुळे शिवसेनेला संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी बाकांवर स्थान देण्यात आलं आहे. त्याशिवाय तिन्ही पक्षांनी मिळून किमान समान कार्यक्रमाचा मसुदाही तयार केला आहे. मात्र शिवसेनेसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्यापही थेट भाष्य केलेलं नाही. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून अद्यापही संभ्रम निर्माण झालेला आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात? आमदारांना काय सूचना देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजप हा मोहम्मद घोरीच्या प्रवृत्तीचा: उद्धव ठाकरे
शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचं शिवसेनेचे मुख्यप्रतोद सुनील प्रभू यांनी सांगितलं. यावेळी राज्यातील सत्तापेचाबरोबरच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचाही आढावा घेतला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही आमदारांकडून माहिती घेतली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आमदारांना पुन्हा अज्ञातस्थळी ठेवणार?
शिवसेनेने सर्व आमदारांना येताना आधार आणि पॅनकार्डसह पाच दिवस पुरेल एवढे कपडे घेऊन यायला सांगितले आहे. आमदारांची राज्यपालांसमोर ओळख परेड करण्याची वेळ आली तर आधारकार्ड आणि पॅनकार्डद्वारे ओळख पटवता येऊ शकते, म्हणून या आमदारांना ओळखपत्र घेऊन येण्यास सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं. दिल्लीत सत्तेस्थापनेबाबतच्या वेगवान हालचाली होत आहेत. दोन-चार दिवसात त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा आमदारांना मुंबईत बोलवावे लागण्याची शक्यता असल्याने त्यांना थेट कपडेच घेऊन यायला सांगितले आहे. त्यामुळे या आमदारांना मुंबईतच पुन्हा अज्ञातस्थळी ठेवण्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
आपसात भांडून दोघांचे नुकसान: मोहन भागवत
राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपला सर्वाधिक १०५ जागा जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला ३, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण १३ अपक्षही निवडून आले आहेत.
संजय राऊत म्हणजे कुजका म्हातारा: नीलेश राणे