मुंबई: पक्ष सोडून जाणाऱ्यांना पळपुटे म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. 'आज तुम्ही ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबू भुईसपाट झाल्यावर स्वाभिमानाचे नाव का घेता? हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो?,' असा खोचक सवाल उद्धव यांनी पवारांना केला आहे.
राजकीय संकटात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या मोठी पडझड सुरू आहे. आजी-माजी आमदार, खासदार व नेते पक्ष सोडून जात आहेत. ही पडझड थांबवण्यासाठी मैदानात उतरलेल्या पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना पळपुटे म्हणून हिणवले होते. या लोकांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवल्याचं पवार यांनी म्हटलं होतं. पवार यांच्या या टीकेचा उद्धव यांनी 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. पवार यांच्या राजकीय इतिहासाची उजळणी करत उद्धव ठाकरेंनी त्यांनाच काही प्रश्न केले आहेत. वळणाचे पाणी वळणाला गेले आहे, असंही त्यांनी सुनावलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणतात...
>> स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तुम्ही सोनियांबरोबर वाद केला. काँग्रेसमध्ये बंड केले. त्याच सोनियांबरोबर मागील दीड-दोन दशकांपासून त्यांचे गुप्तगू सुरू आहे.
>> शिवसेना किंवा भाजपमधील काही मंडळी काँग्रेस व राष्ट्रवादीत सामील करून घेतली तेव्हा या मंडळींनी स्वाभिमानाचे कोणते शिखर जिंकले होते? त्यांनी तेव्हाही स्वाभिमान वगैरे शब्दांची ऐशी की तैशीच केली होती.
>> राजकारणात सध्या सोय आणि तडजोड महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रवादीच्या रथावर सध्या स्वार झालेले डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचेच पार्सल आहे व ते तुमच्या रथावर चढल्याने स्वाभिमानाचे वजन वाढून रथाचा टायर पंक्चर झाल्याची बातमी नाही.
>> स्वाभिमान हा शब्द सध्या कोणत्याही राजकारण्याने वापरू नये. छत्रपती शिवाजी महाराज व चिंतामणराव देशमुख यांनी महाराष्ट्र अस्मितेसाठी जो स्वाभिमान दाखवला त्याची सर कुणालाच येणार नाही.
राजकीय संकटात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या मोठी पडझड सुरू आहे. आजी-माजी आमदार, खासदार व नेते पक्ष सोडून जात आहेत. ही पडझड थांबवण्यासाठी मैदानात उतरलेल्या पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना पळपुटे म्हणून हिणवले होते. या लोकांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवल्याचं पवार यांनी म्हटलं होतं. पवार यांच्या या टीकेचा उद्धव यांनी 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. पवार यांच्या राजकीय इतिहासाची उजळणी करत उद्धव ठाकरेंनी त्यांनाच काही प्रश्न केले आहेत. वळणाचे पाणी वळणाला गेले आहे, असंही त्यांनी सुनावलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणतात...
>> स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तुम्ही सोनियांबरोबर वाद केला. काँग्रेसमध्ये बंड केले. त्याच सोनियांबरोबर मागील दीड-दोन दशकांपासून त्यांचे गुप्तगू सुरू आहे.
>> शिवसेना किंवा भाजपमधील काही मंडळी काँग्रेस व राष्ट्रवादीत सामील करून घेतली तेव्हा या मंडळींनी स्वाभिमानाचे कोणते शिखर जिंकले होते? त्यांनी तेव्हाही स्वाभिमान वगैरे शब्दांची ऐशी की तैशीच केली होती.
>> राजकारणात सध्या सोय आणि तडजोड महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रवादीच्या रथावर सध्या स्वार झालेले डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचेच पार्सल आहे व ते तुमच्या रथावर चढल्याने स्वाभिमानाचे वजन वाढून रथाचा टायर पंक्चर झाल्याची बातमी नाही.
>> स्वाभिमान हा शब्द सध्या कोणत्याही राजकारण्याने वापरू नये. छत्रपती शिवाजी महाराज व चिंतामणराव देशमुख यांनी महाराष्ट्र अस्मितेसाठी जो स्वाभिमान दाखवला त्याची सर कुणालाच येणार नाही.