अ‍ॅपशहर

मशिदीच्या भोंग्यांवरून राज ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम; राऊतांनी तिरकस शैलीत दिलं उत्तर

राज ठाकरे यांनी राज्य सरकारला आक्रमक इशारा दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2022, 11:01 am
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे (Sanjay Raut On Raj Thackeray). 'राजकीय व्यासपीठांवरून अशा प्रकारच्या घोषणा होतच असतात. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकार आहे आणि काय निर्णय घ्यायचा हे सरकारला माहीत आहे. कोणीही येऊन काहीही बोलतं आणि आम्हाला कायद्याची भाषा शिकवण्याचा प्रयत्न करतं, त्यांना त्यांचा आनंद घेऊ द्या,' असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम SANJAY RAUT mumbai
संजय राऊत (फाईल फोटो)


संजय राऊत यांनी मनसेसह भाजपवरही जोरदार टीका केली आहे. रामनवमीच्या शोभायात्रांमध्ये झालेली हिंसा ही सत्ताधारी पक्षाकडून आगामी निवडणुकांसाठीची तयारी आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. तसंच या देशाला पुन्हा एकदा फाळणीच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही ते म्हणाले.

शिवसैनिकांनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं; जुना फोटो लावत शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी

सरसंघचालकांच्या वक्तव्यावरही दिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतंच अखंड भारताविषयी एक वक्तव्य केलं आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'संघाने अखंड भारताची भूमिका मांडली असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो. देशातील कोणताच पक्ष अखंड भारताच्या भूमिकेला विरोध करणार नाही. मात्र यासाठी त्यांनी १५ वर्षांचा कालावधी सांगितला आहे. आमची तर मागणी आहे पुढच्या १५ दिवसांतच तुम्ही पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घ्या,' असं तिरकस भाष्य राऊत यांनी केलं आहे.

किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा निशाणा

'आयएनएस विक्रांत' निधी अपहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला. याविषयी राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मिळणं हा दिलासा घोटाळा आहे. कोर्टाने जरी त्यांना दिलासा दिला असला तरी त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. सोमय्या पिता-पुत्र तुरुंगात जाणारच,' असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज